Wednesday, February 23, 2011

सेंद्रिय शेती करी पर्यावरणाची माती

"आधुनिक पद्धतीच्या शेतीतुन शेती खर्च वाढतो व् शेतकरी कर्ज बाजारी होतो आणि त्यातून शेतकरी आत्महत्या करतात हां या मंडळीचा आवडता सिद्धांत. या सिद्धान्ताने शेतकरी तेव्हाही कर्ज बाजारी होता हे सत्य झाकता येते.तेव्हाच्या कर्जबाजारी पणात व् आजच्या कर्जबाजारी पणात संख्यात्मक फरक असला तरी गुणात्मक फरक नव्हता हे सत्य या सिद्धांताच्या पोटात लापविता येते.सर्वात महत्वाचे म्हणजे हां सिद्धांत स्वीकारला की शेती मालाच्या भावाचा प्रश्न बाजुला टाकता येतो व् शेतकरी आत्महत्त्ये साठी शेतीमालाचे भाव नव्हे तर शेती करण्याची पद्धत जबाबदार असल्याची उर बडवेगिरी उजागिरिने करता येते."

सेंद्रिय शेती करी पर्यावरणाची माती

एके काळी स्वामी विवेकानंदाचे अवतार म्हणून चर्चेत असलेले हिवरा आश्रमाचे शुकदास महाराज आता संत म्हणून सर्व दूर परिचित आहेत.आश्रम परिसरातील शेती विषयक प्रयोगाने शेती तद्न्य म्हणून ही त्यांची ख्याती आहे.मात्र अध्यात्मिक क्षेत्रात त्याना गुरूस्थानी मानणारा शेतकरीही त्याना शेती क्षेत्रात गुरु मानायला तयार नसल्याचे त्यांच्या शेती विषयक ताज्या मागणी वरून स्पष्ट होते.शुकदास महाराजानी मुख्यमंत्र्याकडे केरळ च्या धर्तीवर जैविक शेतीचे धोरण स्वीकारुन कीटकनाशकाच्या उपलब्धतेवर निर्बंध लादावेत जेणे करून पर्यावरण व् जैवविविधता संकटात येणार नाही, अशी मागणी केली आहे.या पूर्वी महाराजानी बी टी वांग्याचा यशस्वी विरोध केल्याचाही त्या वृत्तात उल्लेख आहे. महाराज शेती विषयक जे बोलतात त्याचा सर्व साधारण शेताकर्यावर फारसा परिणाम होणार नसला तरी सरकारच्या धोरण विषयक निर्णयावर प्रभाव टाकण्यासाठी किंवा आपले घोड़े पुढे दामटन्यासाठी शेतीचे अद्न्यानी अभ्यासक व कथित पर्यावरण प्रेमी यांच्या हाती आयते कोलीत मिळनार असल्याने महाराजांच्या म्हनन्यातील तथ्य तपासून पाहण्याची गरज आहे.
प्रत्येक संताचे लोक प्रबोधन हे अंगीकृत कार्य असते.राज्यकर्त्याना द्न्यान देण्यासाठी त्यांचा जन्म नसतो.राज्यकर्ते सल्ला आणि आशिर्वादासाठी आलेच तर शिष्टाचार म्हणून सल्ला व आशिर्वाद देतात इतकेच.पण कीटक नाशकाच्या वाढत्या वापराने शेतकरी पर्यावरण व विविध जीव जन्तुन्चा नाश करीत असल्याने परिस्थितीचे गाम्भीर्य लक्षात घेवुन महाराजानी मुख्यमंत्र्याकडे धाव घेतली असे त्याचे समर्थन त्यांचे समर्थक नक्कीच करतील.पर्यावरण विनाशाची काळजी महाराजानी करायची नाही तर कोणी करायची असे कोणी म्हटले तर त्यातही काही चुक नाही.चुक दिसते ती एवढीच आहे की,महाराजांचे शेती विषयक प्रयोग बघून परिसरातील व आश्रमात दूर-दुरून येणारे शेतकरी यांचे डोळे का दिपले नाहीत याचा विचार महाराजाना करावासा वाटला नाही.लाखो नाही तरी आश्रमाच्या आजुबाजुच्या गावातील हजारो एकर शेती महाराजांच्या शेती प्रयोगाने प्रभावित होवून सेंद्रिय पद्धतीने फुलायाला हरकत नव्हती. तसे घडले नाही याचे कारण अगदी सरळ आणि उघड आहे.महाराजान्पेक्षा सर्वसाधारण शेतकरी जास्त अनुभवी आहे.पिढ्या न पिढ्यांचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे.संकरित बियाने ,रासायनिक खते व कीटक नाशके यांचा भारतीय शेतीत प्रवेश आणि प्रयोग होण्या आधी आपल्याकडे सेंद्रिय शेतीच केल्या जायची-अगदी नेहरु-शास्त्री युगा पर्यंत म्हणजे १९६० च्या दशकाच्या मद्ध्या पर्यंत. त्या नंतर कथित हरित क्रांती आली.सेंद्रिय शेतीची हरित क्रांती कड़े झालेली वाटचाल पाहणारी व प्रत्यक्ष या दोन्ही प्रकारच्या शेतीचा अनुभव घेणारी पीढी आज ही हयात आहे आणि वृद्ध असली तरी नाईलाजाने शेतीच करीत आहे. सेंद्रिय शेतीतुन सर्वच प्रकारच्या अभावाचे जे चटके या पिढीने सहन केले आहेत ते बघता कोनाचीच मागे जाण्याची तयारी नाही हे शुकदास महाराजासह सर्वच सेंद्रिय शेती समर्थक व पर्यावरण वादी लक्षात घेत नाहीत. आधुनिक पद्धतीच्या शेतीतुन शेती खर्च वाढतो व् शेतकरी कर्ज बाजारी होतो आणि त्यातून शेतकरी आत्महत्या करतात हां या मंडळीचा आवडता सिद्धांत. या सिद्धान्ताने शेतकरी तेव्हाही कर्ज बाजारी होता हे सत्य झाकता येते.तेव्हाच्या कर्जबाजारी पणात व् आजच्या कर्जबाजारी पणात संख्यात्मक फरक असला तरी गुणात्मक फरक नव्हता हे सत्य या सिद्धांताच्या पोटात लापविता येते.सर्वात महत्वाचे म्हणजे हां सिद्धांत स्वीकारला की शेती मालाच्या भावाचा प्रश्न बाजुला टाकता येतो व् शेतकरी आत्महत्त्ये साठी शेतीमालाचे भाव नव्हे तर शेती करण्याची पद्धत जबाबदार असल्याची उर बडवेगिरी उजागिरिने करता येते. आज सेंद्रिय शेतीचे कौतुक प्रसिद्धी माध्यमातून होत असले , यातून मिळनार्या खर्या-खोट्या नफ्यांची वर्णने प्रसिद्ध होत असली व सर्व पर्यावरण वादी अशा शेतीचे गोडवे गात असले तरी शेतकरी तिकडे वळत नाही याचे कारण या शेतीचा त्यांच्या पाठीशी असलेला दांडगा पण वाईट अनुभव आहे. आज सेंद्रिय शेती करणारे आणि सेंद्रिय शेतीचा प्रचार-प्रसार करणारे या पैकी कोणाचेही पोट शेतीवर अवलंबून नाही.शेती हां काही त्यांच्या उपजिविके साठीचा अपरिहार्य असा धंदा नाही. असलाच तर निर्याती वर डोळा ठेवून केलेला तो जोड़धंदा आहे. सेंद्रिय शेतीतुन उपजलेला अभाव फ़क्त शेतकरी कुटुम्बा पुरताच मर्यादित नव्हता.तेव्हाचे अन्न संकट सम्पूर्ण देशाने अनुभवले आहे.अमेरिकेत पशु खाद्य म्हणूनही वापरले जाणार नाही असे धान्य आयात करून या देशाला गुजरान करावी लागली आहे.भूक बळी हे तेव्हाचे दाहक वास्तव होते.शेती वर अवलंबून असलेली शेतकरी-शेतमजुरांची कुटुम्बे तर वर्षानुवर्षे अर्ध पोटी राहिली आहेत.शेतीवर अवलंबून असलेल्यान्चाच नाही तर सम्पूर्ण देशाची उपासमारीतुन सुटका केवळ हरित क्रांतीने झाली हे विसरून चालणार नाही.स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशाची लोकसंख्या आजच्या लोकसंख्येच्या एक चतुर्थान्शही नव्हती आणि औद्योगीकरण व नागरीकरण कमी असल्याने शेती क्षेत्र आजच्या पेक्षा अधिक होते.या स्थितीत सुद्धा परम्परागत बियाने व काडी-कचरा , पाला-पाचोला व शेणख़त यांच्या सहाय्याने केलेली शेती देशाची अन्न-धान्याची गरज भागवू शकत नव्हती.मग पुन्हा मागे जावून आम्ही सव्वाशे कोटी लोकसंख्येचे पोट कसे भरणार आहोत? संकरित बियाने,रासायनिक खते व कीटकनाशके यांची शेतीमाल उत्पादन वृद्धी साठीची परिणामकारकता कमी होत चालली आहे व त्याचे शुकदास महाराज व नेहमीचे पर्यावरणवादी कलाकार म्हणतात त्याप्रमाणे त्याचे दुष्परिणाम होत आहेत हे अगदी खरे आहे.याचा अति वापर हे जसे त्याचे एक कारण आहे ,तसेच ६० च्या दशकात आपल्या शेतीत आलेले हे तंत्रद्न्यान संशोधनातून आणि अनुभवातून अधिक प्रगत करण्याचा व या तंत्रद्न्यानाची उपयुक्तता संपूस्टात येत असल्याचे लक्षात आल्यावर नवे तंत्रद्न्यान स्वीकार व आत्मसात करण्याची मानसिकता तयार करण्यात येत असलेले अड़थले हे दुसरे महत्वाचे कारण आहे. शुकदास महाराजांच्या प्रयत्नांचा व मागणीचा असाच परिणाम होणार आहे. संशोधनाचे तर आमच्या देशाला वावडे आहे असे वाटण्या सारखी परिस्थिती आहे.कधी काळी आमच्याकड़े शुन्याचे संशोधन झाले होते , त्या संशोधनाचा उपयोग आम्ही संशोधनाच्या बाबतीत शून्य आहोत हे दर्शाविन्यासाठीच होतो! आमच्याकडे शेती पासून ते सरक्षणसिद्धी साठी जेवढ्या म्हणून संशोधन संस्था आहेत त्या पांढरे हत्ती म्हणून आम्ही पोसतो आहोत.दुसर्याचे संशोधन चोरून आपल्या नावावर खपविन्यात आमच्या संशोधकाची सगळी प्रतिभा खर्च होते! हरित क्रांतीचे जे तन्त्रद्न्यान आमच्याकडे आले ते याच मार्गाने! या संशोधनावर आपला हक्क सांगुन मानमरातब,पुरस्कार व पदे मिळविनारे आता शेतीत नवे तंत्रद्न्यान येवू नये म्हणून जिवाचा आटापिटा करीत आहेत. त्यांच्या नावावर जमा असलेले हे संशोधन इतिहास जमा झाले तर त्यांचे नाव ही इतिहास जमा होइल ही भीती त्याना वाटतअसावी!अन्यथा खराखुरा संशोधक नव्या संशोधनाचा विरोध कसा करील?कीटकनाशकाचे दुस्परिनाम दिसू लागल्यावर कीटकनाशकाची आवश्यकता संपूस्टात आणणारे बी टी तंत्रद्न्यान नाकारन्याचे कारणच नाही.पण पर्यावरण रक्षनाच्या गोंडस नावावर हे सगळे केले जात आहे. एक वस्तुस्थिती मात्र पर्यावरणवादी कधीच समोर येवू देत नाहीत.ही वस्तुस्थिती समोर आली तर अनेकाना भोवळ येण्याची शक्यता आहे.माणसाचे पर्यावरण विरोधी पडलेले पाहिले पाउल म्हणजे शेती करण्याचा प्रारम्भ हे आहे-औद्योगीकरण व नव-नवे तंत्रद्न्यान व संशोधन नव्हे!वैद्न्यानिक कसोटी लावून विचार केला तर आधुनिक पद्धतीच्या शेती पेक्षा पारम्पारिक किंवा सेंद्रिय शेती तुलनेने जास्त पर्यावरण विरोधी आहे हे दिसून येइल.एवढेच नव्हे तर आज परवलीचा शब्द बनलेल्या ग्लोबल वार्मिंग ला उद्योगापेक्षा शेती जास्त कारणीभूत आहे हे सत्य स्विकारायला जड़ असले तरी तेच वैद्न्यानिक सत्य आहे.जगात औद्योगिकरनाने वेग घेतल्या पासून म्हणजे सुमारे १५० वर्षा पासून पर्यावरणाचा तोल बिघडविनारे व पृथ्वीचे तापमान वाढविणारे जे वायु मानवी कृतीतुन उत्सर्गित होत आलेत त्याच्या वैद्न्यानिक अभ्यासाचे निष्कर्ष काय सांगतात? या अभ्यासानुसार गेल्या १५० वर्षात औद्योगिकरनामुले वातावरनातीलकार्बन डाय ओक्साइड चे प्रमाण ३१% ने वाढले आहे , तर शेती व शेतीशी संबद्धित जनावरे यातून गेल्या १५० वर्षात वातावरनातील मीथेन वायुत थोड़ी थिडकी नाही तर १५१% वृद्धी झाली आहे! काडी कचरा कुजने व शेण व त्यापासून ख़त तयार होण्याच्या क्रियेतुन मीथेन वायु वातावरणात सोडल्या जातो.भात शेतीतुन अधिक प्रमाणात मीथेन बाहेर पडतो. कोळसा,नैसर्गिक वायु व तेल यांच्या ज्वलनातुन ऊर्जा निर्माण करण्याच्या प्रक्रियेत कर्ब वायु वातावरणात जातो.हे वायु उस्णता धरून ठेवतात म्हणून तापमानात वृद्धी होत असते. शेतीतुन वातावरणात जाणारा मीथेन वायु हां औद्योगिकरनातुन वातावरणात सोडल्या जाणार्या कार्बन वायु पेक्षा ३१ पट अधिक उस्नता धरून ठेवतो.हां वैद्न्यानिक निष्कर्ष शेतीच्या व विशेषत: सेंद्रिय शेतीच्या विरोधात जाणारा आहे.औद्योगिकरनाद्वारे वातावरणात सोडला जाणारा मानव निर्मित कार्बन वायु झाडांचे,जंगलांचे संरक्षण व् संवर्धन केले तर ऑक्सिजन मधे परावर्तित होत राहतो,पण शेतीतून निर्माण होणारा , शेण,काड़ी-कचरा यांच्या कुजन्यातुन निर्माण होणारा मीथेन वायु वातावरणात तसाच राहून पर्यावरनाला हानी पोचविन्याचे काम करीत राहतो.याचा अर्थ सेंद्रिय शेती म्हणजे केवळ उपासमारीलाच निमंत्रण नाही तर पर्यावरनाला सुद्धा घातक आहे.म्हनुनच शुकदास महाराजानी पर्यावरनाला हानी पोचविनारा सेंद्रिय शेतीचा उद्योग सोडून शेतीत आधुनिक तंत्रद्न्यान आनन्यासाठी प्रयत्न केला तर महाराजाचे भक्त बनन्यात शेतकरी भावा-बहिणीना धन्यता वाटेल. (समाप्त) --------सुधाकर जाधव

पांढरकवडा, जि.यवतमाळ ssudhakarjadhav@gmail.com मोबाइल न.9422168158

Sunday, February 6, 2011

जागतिकिकरनाच्या गंगेत शेतकरी कोरडाच !

गेल्या शतकातील नव्वदीच्या दशकात भारतात जागतिकिकरनाचे वारे सुरु झाले.प्रत्यक्ष अंमलबजावणी व परिणाम दिसन्या आधीच प्रत्येक व्यासपीठावर या विषयावर अनुकूल किंवा प्रतिकूल भूमिका घेवुन वाद रंगु लागले .अनेकाना अनेक विषयाचे मुळ जागतिकिकरनात असल्याचा साक्षात्कार झाला.एकीकडे डावे,पुरोगामी,पर्यावरणवादी ,गांधीवादी व तत्सम समूह व व्यक्तीना जगातल्या सर्व समस्याना जागतिकीकरण कारणीभूत असल्याचा तर दूसरी कड़े सर्व स्वतंत्रतावादी, उद्योजक,कुंठीत अर्थ व्यवस्थेने मेटाकुटीला आलेली जगातली सरकारे याना जागतिकिकरनातुन सर्व समस्यांचे निराकरनाचा साक्षात्कार झाला.या वादाने बहुतेकांची बौद्धिक खाज,तहान, भूक भागुन ते समाधानी पावले असतील.व्यवस्था कोणतीही असो फासे आपल्याच बाजूने पाडन्याची हातोटी साध्य केलेले हे साधक असल्याने जागतिकिकरनाचा त्यांच्यावर विपरीत परिणाम होण्याचा संभव नव्हताच.पण सर्व व्यवस्था मध्ये सदैव नाडला गेलेला, संपत्तीचा निर्माणकर्ता असुनही दारिद्र्याने ज्याची कधी पाठ सोडली नाही अशा शेतकरी समुदायाला जागतिकिकरनातुन सुखाचे दिवस येण्याचे पडलेले स्वप्न मात्र दू:स्वप्न ठरल्याचे आजची या समुदयाची दैना पाहून म्हनने क्रमप्राप्त आहे।
जागतिकिकरनाने शेतकरी संघटना व शेतकरी समुदयास पाडलेली भुरळ चुकीची होती असे नाही.आज पर्यंतच्या राज्यकर्त्यानी वाढत्या क्रमाने शेतकरी विरोधी धोरणे राबवून शेती उत्पादनाच्या वाढत्या लुटीतुन संपन्न वर्ग अधिक संपन्न करणारा विकास साधला होता.सरकार हे शेतकरी वर्गाच्या लुटीचे हत्यार बनले होते.जागतिकिकरनाने हे हत्त्यारच बोथट बनणार होते. जागतिकिकरनाने सरकारची आर्थिक क्षेत्रातील लुडबुड कमी होणार होती.झोन बंदी ,जिल्हा बंदी,प्रांत बंदी आणि निर्यात बंदी ही शेती मालाचे भाव पाडन्यासाठी वापरली जाणारे हुकुमी एक्के सरकारच्या हातातून जाणार होती.शेतकरी समुदायाच्या भल्यासाठी सरकारने काहीच करण्याची गरज नाही, फ़क्त सरकारने शेतकरी समुदायाचे भले होवू नये या साठीच्या उपाय योजना सोडाव्यात ही शेतकरी संघटनेची प्रारंभी पासुनंची मागणी जागतिकिकरनाने पूर्ण होणार होती ! ती सुद्धा वैधानिक स्वरूपात,जगातल्या २०० पेक्षा अधिक राष्ट्रात करार होवून!सततच्या सरकारी धोरनाने आणि हस्तक्षेपाने प्रत्येक वर्षीचा वाढता तोटा सहन करूनही शेती व्यवसाय वाचाविनारा शेतकरी स्वत:च्या अनुभवाच्या ,चिकाटीच्या व परिश्रमाच्या जोरावर शेती व्यवसाय फायदेशीर करू शकतो हां होरा काही चुकीचा म्हणता येणार नाही.शिवाय जागतिकिकरनाने त्याला जागतिक बाजार पेठ खुली होणार होती.या बाजार पेठेत सबसीडी च्या जोरावर तग धरून असलेला संपन्न राष्ट्रातील शेतीकरी व उणे सबसिडित शेती करणारा भारतीय शेतकरी असा सबसिडित भेदभाव राहणार नसल्याने भारतीय शेतकरी स्पर्धेत जिंकणार हां आशावाद निराधार नव्हताच.शेतकरी संघटना व संघटनेचे नेते शरद जोशी यानी जागतिकीकरनाची केलेली भलावन चुकीची नसली तरीही गेल्या वीस वर्षात जागतिकिकरनाने शेती व शेतकरी यांचे काडीचेही भले झाले नाही हे सत्य कसे नाकारता येइल?
पण मग चुकले कुठे?
जागतिकिकरनाच्या मुद्द्यावर शरद जोशींचे जे सहकारी त्याना व संघटनेला सोडून गेले आणि जागतिकिकरना विरुद्ध रणशिंग फुंकले त्यानी स्वत:ची पाठ थोपटून घेण्याची गरज नाही.एक बाब अगदी स्पष्ट आहे.शरद जोशीनी संघटनेची म्हणून शेतीच्या अर्थकारणा बद्दल जी भूमिका मांडली ती प्रारम्भा पासून आज तागायत तशीच आहे.त्यात कोठेही विसंगती दाखविता येत नाही.शरद जोशींची सगली धरसोड राजकीय आहे.त्यानी वेळोवेळी राजकीय भूमिका बदलल्या,राजकीय साथीदार बदलले व त्याची किंमत त्याना स्वत:ची व संघटनेची विश्वासार्हता गमावून चुकवावी लागली असे म्हणता येइल.या शिवाय हलक्या कानाचे असने हां मोठ्या नेत्यात असणारा दुर्गुण शरद जोशीत असू शकतो व यातून एखाद्याला डोक्यावर घेणे व एखाद्याला आपटने असे घडू शकते !शेवटी प्रेषिताचे पाय ही मातीचेच असतात हे विसरून कसे चालेल? आणि या साठी जे त्याना व संघटनेला सोडून गेले ते समजन्या सारखे आहे.पण जागतिकीकरना संदर्भात शरद जोशीनी अचानक वेगली भूमिका घेतली किंवा घुमजाव केले असा समज करून घेण्याला कोणताही आधार नाही.शरद जोशींची खरी चुक,ज्याला घोड़ चुकही म्हणता येइल , जागतिकिकरनात आंदोलनाची गरजच नाही हे मानण्यात झाली! वर्षानुवर्षे जी व्यवस्थाआणि सत्ता शेतकरी विरोधी राहिली तिच्यावर जागतिकिकरनाचा जादुई कांडी सारखा परिणाम होइल ही समजूत किती भाबडेपणाची होती हे शेती व शेती माला संदर्भातील ताज्या घडामोडी वरून स्पष्ट झाले आहे.समाजातील प्रभावी व प्रस्थापित वर्गाने जागतिकिकरनातुन उपलब्ध झालेल्या तंत्रद्न्यानाचा, संपत्तीचा व त्यातून निर्माण झालेल्या सर्व सुख सोयीचा स्वत:च्या चैनी साठी वापर करून घेत जागतिकिकरनाचा विरोध चालविला आहे,ही निव्वळ दाम्भिकता नाही तर शेतकरी पूर्वी सारखेच वेठबिगार राहिले पाहिजेत या साठीचा तो नियोजनबद्ध प्रयत्न आहे.अन्यथा कांदे व इतर शेतमालासाठी चार पैसे मोजने त्याना काय अवघड होते? शेती मालाच्या भाव वाढीचा खरा लाभ शेत मजुराना होवुनही डावे व् पुरोगामी शेतकरी समुहाच्या विरोधात चैन आणि विलास याला चटावलेल्या संपन्न समुहाच्या बाजूने लढ़तात यावरून शेती व् शेतकरी यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोण किती दूषित व् झापडबंद आहे हे स्पष्ट होते.वेळ आली तर हे सर्व समूह वर्ग व वर्ण भेद विसरून सरकारला वेठीस धरून ते शेतकरी समुदयावर वरवंटा फिरवतील याचे अनुमान शरद जोशीना कसे बांधता आले नाही याचे नवल वाटते.जागतिकीकरनाच्या प्रक्रियेत सरकारचे अधिकार कमी होणार,शेतकर्याला ओरबाडनारी वाघ नखे खुंटीला टान्गावी लागणार हां होराही सपशेल चुकला.अधिकार आणि सत्ता याला आच येणार नाही व सत्तेतुन येणारे वैध-अवैध आर्थिक लाभ हिरावले जाणार नाहीत किम्बहुना त्यात वृद्धी होइल याच मर्यादेत जागतिकीकरनाची वाटचाल होत आली आहे.म्हनुनच सरकारने अनेकदा जागतिकीकरनाच्या दिशेने एक पाउल पुढे टाकुन दोन पाऊले मागे घेतली आहेत.शिवाय जी काही पाउले पुढे पडली ती औद्योगिक समूह व त्यांच्याशी निगडित तंत्रद्न्यानाच्या बाबतीत.शेतीचा जागतिकीकरनाशी काही सम्बद्ध आहे हे सरकार च्या गावी नाही किंवा जागतिकीकरनाचा लाभ शेतीला मिळू नये हे कटाक्षाने पाहिले जात असावे हेच सरकारी धोरण दर्शविते.जगभराच्या सरकारांचे असेच धोरण आहे.म्हनुनच शेती मालाचा व्यापार अजुनही चर्चेच्या फेरी वर फेरीत अडकून पडला आहे. शेती क्षेत्रात जागतिकीकरनाच्या दिशेने एखादे पाउल पडल्याचे कोणत्याही अभ्यासकास सोडाच पण दस्तुरखुद्द मनमोहन सिंह यांचे पासून शरद जोशी पर्यंत कोणालाही सांगता व दाखविता येणार नाही.विपरीत निर्णय मात्र मुबलकतेने दाखविता येतील. परदेशात अवैध रित्या पैसा नेणारी नावे उघड न करण्याचा करार सरकार आंतरराष्ट्रीय कराराचे पावित्र्य टिकाविन्याच्या नावावर पुढे रेटनार ,पण शेतीमालाच्या व्यापारा सम्बद्धीचे शेतकरी हिताचे करार कोणतीही पूर्व सूचना न देता क्षणार्धात मोडित काढणार हे शेतामालाच्या अचानक निर्यात बंदिने अनेकदा दिसून आले आहे.याचा अर्थ स्पष्ट आहे .जागतिकिकरनाच्या कालखंडात इथल्या व्यवस्थेची व सरकारची भूमिका शेती व शेतकरी यांच्या बाबतीत दुटप्पी व जुलमीच राहिली आहे हे शरद जोशीन्च्याही एव्हाना लक्षात आले असेल.एवढेच नाही तर आजची परिस्थिती पाहून शरद जोशीना सुरेश भटांच्या या ओळी नक्कीच आठवत असतील:-"उष:काल होता होता काळरात्र झाली ,अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली". आकलनात झालेली चुक काबुल करून शरद जोशीनी वय अनुमती देत नसले तरी मनातील या ओळी ओठावर आनाव्यात असेच प्रत्येक शेतकरी भावा-बहिणीला वाटत असणार!
संघटना व आंदोलनाची गरज
जागतिकीकरनाने शेतीमालाला चांगले भाव मिळू शकतात ,पण संघटन व आन्दोलन मजबूत नसेल तर हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जातो हां मोठा धडा अलीकडच्या घटनानी शेतकरी व शेतकरी कार्यकर्त्याना मिळाला आहे. नासुकल्या कांद्याने आजची व्यवस्था शेतकरी विरोधी व असंवेदनशील असल्याचे प्रमाणित केले आहे.शेतकरी समुदायाच्या हातात आर्थिक ताकद असती तर हां विरोध मोडून काढ़ने कदाचित शक्य झाले असते.ही ताकद त्याच्याकडे नसल्याने संघटना व आन्दोलन या शिवाय त्याच्याकडे दूसरा पर्याय उपलब्ध नाही. सत्ता हातची जावू नये म्हणून शेती मालाचे भाव पाडन्यास तत्पर असलेल्या सरकारला शेती मालाचे भाव पडले व पाडले तर सत्ता हातची जाइल अशी जरब बसण्याची गरज आहे.हे संघटन व आन्दोलन यानेच संभव आहे. नवे तंत्रद्न्यान , बियाने यालाही मुकन्याची वेळ संघटन व् आन्दोलन मजबूत नसेल तर येते हे बीटी वान्ग्याने दाखवून दिले आहे.संघटन व् आन्दोलन मजबूत नसेल तर निव्वळ आपल्या नाव लौकीकाच्या जोरावर १०-२० लोक धान्या पासून मद्यनिर्मितीला विरोध करण्याची अतार्किक भूमिकाही रेटू शकतात हां इतिहास ही ताजाच आहे. ताज्या परिस्थितीने सर्वात मोठा धडा शरद जोशी व् सर्व शेतकरी समुदायाला मिळाला आहे-जागतिकिकरनाचा लाभ शक्तीशाली शेतकरी आन्दोलना शिवाय प्राप्त होने अशक्य कोटीतील गोष्ट आहे!वाट चुकलेल्या शेतकरी आंदोलनातील कार्यकर्त्यान्साठीही मोठा धडा आहे-जागतिकीकरना विरुद्ध संघर्षात शक्ती वाया घालाविन्या ऐवजी जागतिकीकरनाचा लाभ शेतकरी समुदयास मिळावा या साठी प्रयत्नांची पराकास्टा करण्याची गरज आहे.ज्यानी शेतकरी समुदायाला धड़े दिले त्यानाच धड़े देण्याची वेळ शेतकरी समुदयावर येणार नाही अशी आशा करू या! (समाप्त) ---सुधाकर जाधव
भ्रमणध्वनी-९४२२१६८१५८
पांढरकवडा जि।यवतमाळ