Wednesday, December 22, 2010

खायच्या कांद्याची टंचाई पण अकलेच्या कान्द्यांचा सुकाळ

खायच्या कांद्याची टंचाई पण अकलेच्या कान्द्यांचा सुकाळ
कांदे महागले आणि मध्यम वर्गीय,उच्च मध्यम वर्गीय आणि ज्यांच्या संपत्तीची मोजदाद करने आयकर खात्याला कधीच जमले नाही असे नव श्रीमंत आणि सत्ते सोबत ज्यांच्या अवती भवती लक्ष्मीचा संचार आहे अशा धनाढ्य राजकारन्यान्च्या तोंडचे पानी डोळ्यातून वाहू लागले आहे.ज्यांच्या जेवणात कांदा हां घटक वर्षानुवर्षे अपरिहार्य पणे राहात आला ते गरीब आणि कस्टकरी कांद्या विना विना तकरार भागवू लागले आहेत,पण ज्याना तोंडी लावण्यासाठी व सलाद साठी कांदा हवा असतो अशा पाच अन्कापासुन ते अनंत अंकापर्यंत रोजचे उत्पन्न असलेले घटक कांद्याच्या भाव वाढी विरुद्ध सुनामी आल्यागत ओरड करू लागले आहेत.आजचा मीडिया याच वर्गाचे प्रतिनिधित्व करीत असल्याने त्यांचा आवाज सत्ताधारी वर्गा पर्यंत पोचविन्याचे कार्य इमाने इतबारे करीत आहे.महागड्या डीलक्स गाड्यातुन भाजी खरेदीसाठी आलेल्या गृहिनीच्या कांद्याने डोळ्यात पाणी आनल्याच्या हास्यास्पद भाकड कथा ऐकविल्या जात आहेत.कांदा भाव वाढीची सर्वद्न्यानी असल्याच्या थाटात कपोलकल्पित कारण मीमांसा करून अकलेच्या कान्द्यांचे दर्शन आणि प्रदर्शन करणार्या प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त होत आहेत.आता तर अशा प्रतिक्रिया साठी सोशल नेट वर्किंग साईटचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने अकलेच्या कान्द्यांचेही मोठ्या प्रमाणावर दर्शन आणि प्रदर्शन होत आहे.अकलेच्या कांद्याची शेती वाढल्याने खायच्या कांद्याचे शेती क्षेत्र घटुन कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्याचे प्रतिपादन जेवढे सत्य किंवा विनोदी असू शकते ,तशीच कांदा भाव वाढीची कारणमीमांसा करण्यात येत आहे .
नफेखोर व्यापारी वर्गाने साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण केल्याने ही भाव वाढ झाल्याचा नेहमीचा ठेवनीतला आरोप करण्याची अहमिका लागली आहे.कांदा उत्पादकाने कांदा अधिक भावाच्या लालसे पोटी घरात दडविल्याचा सूचक आरोप ही होत आहे.पण या अकलेच्या कान्द्याना कांदा ही नाशवंत वस्तु असल्याने त्याची साठेबाजी शक्य नसते हे ही उमगू नये याचे नवल वाटते.शेतीशी सम्बन्ध नसलेल्या मध्यम व उच्च मध्यम वर्गियांचे या बाबतचे अद्न्यान समजन्या सारखे आहे,पण सरकारचे काय?महाराष्ट्र सरकारने मुत्सद्दीपना दाखवून या सम्पूर्ण प्रकरणात आपले तोंड बंद ठेवले असेल तरी पंतप्रधाना सोबतच केन्द्रीय वाणिज्य मंत्र्याने आपले अद्न्यान प्रकट केले आहे.साठेबाजी हेच भाववाढीचे कारण असल्याचा जावई शोध लावून त्यांच्यावर कारवाईचा सज्जड दम भरला। पन्तप्रधानानी तर केन्द्रीय मुख्य सचिवा मार्फ़त राज्याच्या सचिवांची बैठक बोलावून साठेबाजावर कारवाईचे निर्देश दिले!2G स्पेक्ट्रम घोटाला कोणतीही कारवाई न करता चालु राहू देणारे पन्तप्रधान किती तत्परतेने कारवाई करू शकतात हे कांदा प्रकरणात हस्तक्षेप करून त्यानी देशाला दाखवून दिले!देशातील मोठयातमोठ्या दहशतवादी हल्या नंतर देखील सुरक्षा संदर्भात केन्द्रीय सचिवाने राज्य सचिवांची तातडीने बैठक घेतली नाही,पण कांद्याच्या बाबतीत अशी बैठक तातडीने झाली! साठेबाजीने भाव वाढ झाल्याचा दावा खरा असता तर केंद्र सरकारने कारवाईचा बडगा उगारल्यावर प्रश्न मिटला असता.कांदा निर्यात बन्दीचे पाउल उचलन्याचे कारणच नव्हते.कांदा भाव वाढीचे कारण साठेबाजी नसून कांदा टंचाई हे आहे हेच निर्यात बन्दीने सिद्ध होते.व्यापारी वर्गा वरील कारवाई ही आपण महागाईच्या प्रश्नावर गप्प नाही आहोत हे जनतेला दाखवून देण्यासाठी केलेलीधुलफेक आहे हे स्पष्ट होते. कांदा साठविताच येत नाही असे नाही.पण तो प्रकार खर्चिक आहे.तशा फारशा सोयीही या कृषी प्रधान देशात निर्माण करण्यात आल्या नाहीत. वस्तुत: या वर्षीच्या अति आणि सततच्या पावसाने अनेक कृषी उत्पादनाची वाट लागली आणि अशी वाट लागन्यात कांदा हे पीक आघाडीवर आहे.नैसर्गिक आपत्तिने कांदा उत्पादनात झालेली घट हे कांदा टंचाई व कांदा भाव वाढीचे प्रमुख कारण आहे. या परिस्थितीचा लाभ व्यापारी समुदयाने काही प्रमाणात उठाविला असेलही ,पण आजची परिस्थिती त्या कारणाने निर्माण झाली नाही. कांदा उत्पादकाना आता पर्यंत जो भाव मिळत गेला त्यात या हंगामात मिळत असलेला भाव सर्वोच्च असूनही कांदा उत्पादनात आघाडीवर असलेल्या नासिक जिल्ह्याने यंदा अन्य जिल्ह्याच्या तुलनेत आघाडी घेतली आहे हे लक्षात घेतले तर कांदा उत्पादकाची किती हानी व तोटा झाला याचे अनुमान काढ़ने कठीण नाही. पण अज जो वर्ग कांदा भाव वाढी विरुद्ध ओरड करीत आहे त्याने कधीच शेतकरी समुदयाची चिंता केली नाही.चांगले खाऊन पिउन ही खान्या- पिन्या वरचा खर्च कमीच राहावा आणि चैनीसाठी मुबलक पैसा हाती असावा यावरच या वर्गाचा कटाक्ष राहिला आहे.या साठी बाजारातील परिस्थीती अनुकूल नसेल तर सरकार वर दबाव टाकुन ,सरकारला हस्तक्षेप करायला भाग पाडून या वर्गाने स्वत:चा स्वार्थ सतत जोपासला आहे। कांद्याच्या बाबतीत आज तेच घडत आहे.या वर्गाच्या दबावाला बली पडून सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे आणि आयातीवर करात सुट देवून कांद्याचे भाव पाडले आहेत. निर्यात बंदी लादून आयात करण्याच्या निव्वळ घोषनेने कांद्याचे भाव कांदा उत्पादकासाठी क्विंटल मागे २००० रुपयाने कमी झाले आहेत.सरकारी धोरनाने कांदा उत्पादकाचा किती तोटा झाला याचे अनुमान यावरून लावता येइल। या शिवाय मनमानी पद्धतीने निर्यात बंदी केल्याने जागतिक बाजार पेठेत भारतीय शेती मालाला स्थान राहणार नाही हां मोठा धोका आहे.अचानक निर्यात बन्दीने निर्यातदारास झालेले नुकसान लक्षात घेतले नाही तरी एकुणच शेतीमालाच्या निर्यात बन्दीने भारतीय शेती व शेतकरी वर्गावरील विपरीत परिनामाकडे दुर्लक्ष करून कसे चालेल? सरकार व देशातील उच्चभ्रू वर्गाची भूमिका कशी दुटप्पी आहे हे मात्र या निमित्ताने उघड झाले आहे। देशातील मध्यम व उच्च मध्यम वर्गियाचा दबाव येताच सरकारने निर्यात बंदी लादून तातडीने पाकिस्तानातून कांदा आयात केला.पण भाव वाढीच्या रुपाने पाकिस्तानातील मध्यम व उच्च मध्यम वर्गियाला बसताच त्यानी देखील भारतातील त्यांच्या भाईबन्दा (भाईबंद म्हणजे मुस्लिम समुदाय नव्हे तर सर्व मध्यम व उच्च मध्यम वर्गीय!)प्रमाणे तेथील सरकार वर दबाव आणून कांदा निर्यात रोखली तेव्हा भारत सरकार ने निर्यात बंद करण्याच्या पाकिस्तान च्या कृतीवर आपणही असेच केले हे विसरून तीव्र आक्षेप घेतला !भारत सरकारची ही भूमिका दुटप्पीच म्हणावी लागेल.भारत सरकारच्या दबावातुन नव्हे तर पाकिस्तानातील शेतकरी समुदायाचे हित लक्षात घेवुन पाकिस्तान ने तिथल्या मतलबी लोकांच्या कान्गाव्याकडे दुर्लक्ष करून कांदा निर्यात पुन्हा सुरु करून आपली चुक तातडीने दुरुस्त केली । आपला उच्चभ्रू समाज ही कमी दुटप्पी नाही.या लोकांना पाकिस्तानचा प्रचंड राग आहे.पाकिस्तानचा इतिहास,भूगोल,त्यांची संस्कृती या बद्दलचा आमच्या लोकांना कमालीचा अनादर आहे। भारतात पाकिस्तानचे नेतेच नाही तर तिथले सामान्य लोक आलेलेही आवडत नाही.राष्ट्र स्तरावरील मैत्री तर पाकिस्तानशी नकोच आहे पण नागरिक स्तरावरील मैत्रीच्या प्रयात्नानाही यांचा कडाडून विरोध असतो.तिथल्या गायकांचे व इतर कलाकारांचेही याना वावडेच आहे.पण कांदा, साखर व अन्य कृषी उत्पादनावर भारतीय शेतकरी वर्गाच्या पदरात थोड़े अधिक दाम टाकायची वेळ आली तर मात्र या वस्तु पाकिस्तानातून मागावायाला या वर्गाचा अजिबात विरोध नसतो! शेतकरी समुदायाच्या बाबतीत भारतीय प्रसार माध्यमांची भूमिका देखील सातत्याने
दुटप्पी राहिली आहे.शेती उत्पादनात थोड़ी भाव वाढ झाली की त्याची आकाश
कोसल्यागत चर्चा प्रसार माध्यमात सुरु होते. वर्षानुवर्षे शेतकरी वर्गाला उलटी पट्टी
(हां शब्द ही प्रसार माध्यमातील विद्वतजनाना माहीत नसेल) भरावी लागली त्याची
कधीच चर्चा या माध्यमाने केली नाही.विकने परवडत नाही म्हणून उस जालावा लागला
तर तो या माध्यमा साठी चर्चेचा विषय ठरला नाही. भाव नसल्याने कांदा बाजारात नेण्या ऐवजी
रस्त्यावर फेकावा लागला तर त्याची चर्चा प्रसार माध्यमात होत नाही.याची बातमी झालीच
तर शेतकरी वर्गाच्या आगाऊपणातुन वाहतुकीस अड़थला अशी होते! १०० रुपये किलोने विकली जाणारी तुर दाल
५० पर्यंत खाली येते याची चर्चा नाही.पण ५० रुपयाच्या पुढे भाव जावू लागताच माध्य्मानी बोम्ब सुरु केली आहे
शेतकरी समुदायाच्या बाबतीत प्रसार माध्यामानी सतत असा दुजाभाव दाखविला आहे.वास्तविक कांद्याला सर्वोच्च भाव मिळून सुद्धा कांदा उत्पादक जिल्ह्यात आत्महत्या वाढल्या हे वास्तव लक्षात घेवुन कांदा उत्पादकाना अधिक दिलासा देण्याची गरज असताना कांद्याचे भाव पाडन्या साठी युद्ध स्तरावर प्रयत्न सुरु झाले आहेत. गल्लो गल्लीचे अकलेचे कांदे शेतकरी समुदाया विरुद्ध पुकारलेल्या युद्धाला रसद पुरविण्याचे काम करीत आहेत.-(समाप्त)------------------------------------सुधाकर जाधव (मोबाईल-९४२२१६८१५८)
pandharkawada, Dist-yavatmal.--------email:

Sunday, December 5, 2010

लक्ष भोजन ते लक्षावधीना मेजवानी

लक्ष भोजन ते लक्षावधीना मेजवानी
मोहिते ते गडकरी व्हाया मुंडे--बदलत्या मुल्यांचा प्रवास
मला नक्की आठवत नाही पण ते १९७३ साल असावे।या साली घडलेल्या एका घटनेने महाराष्ट्राचे समाजकारण आणि राजकारण प्रचंड तापले होते.महाराष्ट्र नुकताच जीवघेण्या दुष्कालातुन बाहेर पडत होता.अशा प्रसंगी शेती आणि सहकार महर्षी शंकरराव मोहिते यानी अकलूज येथे त्यांच्या घरच्या लग्नात पंचक्रोशीतील लोकांना जेवण दिले.सुमारे एक लक्ष लोक त्या प्रसंगी जेवले होते.महाराष्ट्र राज्य निर्मिती नंतरची सर्वात मोठी जेवनावल असे वृत्तपत्रातून त्याचे रकानेचे रकाने भरून वर्णन प्रसिद्ध झाले होते.ज्यांच्या कड़े शेती जास्त आणि ती सुद्धा बागायती म्हणजे ते माजलेले असणारच ही त्या काळच्या पुरोगामी महाराष्ट्राची सार्वत्रिक भावना .आणि सहकाराशी सम्बन्ध म्हणजे तर जास्तच माजलेले हे समीकरण रुढ़ आणि दृढ़ होते.शेतकरी समुदाया बद्दलची तुच्छतेची भावना उच्चभ्रू आणि शिक्षित समाजात आधीच ओतप्रोत.मग अशा शेतकरयाच्या नेत्याने लक्ष भोजन द्यावे हे सहन करण्या पलिकडचे होते.तसे जेवणात फारसे काही नव्हते.झंझनित रस्सा भाजी ,जिलेबी ,बूंदी असा बेताचाच बेत होता.तरीही साखर पोती आणि वनस्पती तुपाचा हिशेब काढून तो मांडल्या गेला.या उधलपट्टीने सर्वत्र संतापाची भावना निर्माण झाली होती.शंकरराव मोहिते पाटील महाराष्ट्राचे सर्वात मोठे खलनायक ठरले होते.नंतर तर पुरोगामी संघटना व पक्ष यानी भोजनावलीवर निर्बंध घालण्याची मागणी लावून धरली आणि मान्य ही करून घेतली.एवढेच नाही तर मोठ्या समारंभाच्या खर्चाचे हिशेब आयकर खात्याला देण्याचे बंधन घातल्या गेले होते.शेतकरी समाजाची दुरावस्था अशा उधलपट्टीने होते असे निदान करून त्यांच्या दारिद्र्याला त्यानाच जबाबदार धरून सर्व परिवर्तनवादी आणि समाजधुरीन कृतकृत्य झाले होते.पुढे शेतीच्या विपन्नते सोबत महाराष्ट्राची सम्पन्नता वाढू लागली ,कर्ज बाजारी शेताकरयाला नवे कर्ज मिळने दुरापास्त झाल्याने त्यांच्या पानीदार रस्सा भाजी व बूंदा याची जेवानावल जावून उपासमार सुरु झाली आणि दुसरीकडे संपन्न महाराष्ट्रात न भूतो न भविष्यती अशा मेजवान्या देण्याची स्पर्धा सुरु झाली.एकाच लग्नात व्यक्तीचा पैसा ,रुबाब ,पद आणि प्रतिष्ठा पाहून वेग वेगळ्या मेजवान्या देण्याची परम्परा सुरु झाली.मोहिते पाटला कडच्या लक्ष भोजना नंतर लादण्यात आलेल्या निर्बंधाचे,आयकर खात्याला हिशेब देण्याच्या नियम बहुधा नव्या मेजवानी सत्राला लागू नसावेत.ते निर्बंध शेतकरी समुदायाला गरीबीच्या खाइत पडन्या पासून वाचविण्याच्या उदात्त भावनेने लादले होते ना! आणि आयकर अधिकारी शेतकरयाcह्या लग्नात जात नसल्याने आयकर खात्याला हिशेब देण्याची सक्ती केली असावी .पण आता या नव्या मेजवान्याना अक्खे आयकर खाते हजर राहात असल्याने त्याना वेगला हिशेब देण्याची गरजच काय!आणि मेजवान्यातुन गरीबी याच्या इतके हास्यास्पद तर्कट दुसरे नाही हे आता सर्वमान्य आहे.सम्बन्ध वाढविने आणि मजबूत करने या साठी आता या नव्या मेजवान्या आहेत.जेवढे सम्बन्ध वाढतील तेवढी सम्पत्ती वाढेल असे हे नवे मेजवानी शास्त्र आहे.हे शास्त्र खोटे असते तर आज भाजपा चे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन गडकरी नागपुर च्या रेल्वे स्थानकावर हातात कटोरा घेवुन भीक मागताना दिसले असते!

नितिन गडकरी यांच्या मुलाच्या लग्नातील मेजवान्यांचे आणि पदार्थांच्या रेलचेलीचे जे वर्णन प्रकाशित होत आहे आणि प्रकाशात येत आहे ते लक्षात घेतले तर त्यानी मोहिते हे लक्ष भोजना संदर्भातील नावच सन्दर्भहीन करून टाकले!एवढेच नाहीतर गडकरी यानी आपल्याच पक्षातील प्रतिस्पर्धी गोपीनाथ मुंडे यानाही मान खाली घालायला लावली.गेल्या वर्षीच मुन्डेनी आपल्या कन्येच्या विवाहा निमित्त पुणे येथील एका महाविद्यालयाच्या प्रान्गनात भव्य मेजवानीचे आयोजन केले होते.तो समारंभ पाहून तेव्हा उपस्थितांचे डोळे नक्कीच दीपले असतील.पण गडकरी यांच्या कडील समारम्भाने उपस्थितांचे डोळे विस्फारून-विस्फारून बुबूल बाहेर पडण्याची वेळ आली असेल.मुन्डेनी संख्येच्या बाबतीत फार तर मोहिते पाटलाची बरोबरी केली असेल पण गडकरीनी या दोघानाही किती तरी मागे टाकले कदाचित नवा विक्रम ही प्रस्थापित केला असेल.मोहितेंच नाव फ़क्त संख्येच्या बाबतीत घेतले जायचे.इतर तामझामाच्या बाबतीत आता त्यांची गणना 'किस झाड की पत्ती' अशीच करावी लागेल.मोहिते पाटलांचे भोजनार्थी बैल बंड्यातुन आले होते.गडकरी-मुंडे यांचे भोजनार्थी विमानातून ,आलीशान गाड्यातुन आणि कमीतकमी ५० हजाराच्या दुचाकी वरचे होते.पण यात ही गडकरीनी मुन्डेवर मात केली.मुंडे कड़े नागपुर हुन मंत्री -आमदार दोनेक विमानाने गेले होते.दिल्लीहून मुंडे कड़े फार तर एखाद-दुसरया विमानाने पाहुने आले असतील.पण गडकरी कड़े तर तब्बल चालीस विमानाने पाहुने आले होते.ही संख्या चुकू शकत नाही .कारण अक्ख्या नागपुर करानी या विमानाच्या मोजदादीचा आनंद घेतल्याची रसभरीत वर्णने प्रकाशीत झाली आहेत.विमाने सुद्धा कुठून कुठून आली होती !या प्रकाराने मुंडेचा जळफलाट नक्कीच झाला असेल,पण त्याच सोबत अकलूजच्या मोहिते पाटील परिवाराने सुटकेचा उसासा सोडला असेल.कारण भोजनावल आणि खलनायक मोहिते हे समीकरण आता लोकांच्या विस्मरणात जाईल.नव्या मेजवान्या आणि नवे नायक (खलनायक नव्हे)असे समीकरण आता रूढ़ होते आहे.मोहिते पाटलाना खल नायक म्हणून रंगविनारे आता या नव्या नायकांची आरती गात आहेत.गडकरी यांच्या मेजवानीचे वृत्तपत्रातील रकाने वाचले तर याची प्रचिती येइल.भाऊन्चे असे होते,भाऊनी अमुक केले-तमुक केले.भाऊचे किती कौतुक !मोहिते पाटलांच्या नावाने शंख करणारे ,दुष्कालाच्या पार्श्वभूमीवर लक्ष भोजन देवून समाजाप्रती असंवेदनशील असल्याचा मोहिते पाटलावर ठपका ठेवणारे आज हयात असलेले राजकारणी आणि समाजकारणी आता अशा मेजवान्यात सामील होण्यात धन्यता मानताहेत.मुन्ड़ेची मेजवानी शेतकरी आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर झाली.गडकरीन्च्या मेजवानीला शेतकरी आत्महत्ये सोबत निसर्गाच्या कोपाने हीन दीन झालेल्या शेतकरी समुदयाची पार्श्वभूमी आहे.गडकरी यांच्या पक्षाच्या आमदारानी या मुद्द्यावर विधान सभेचे कामकाज होवू दिले नाही.मात्र हेच आमदार मेजवानीचा हां कार्यक्रम व्यवस्थित पार पाडन्यासाठी मनोभावे झटत होते आणि विधिमंडलाच्या कामकाजात व्यत्त्यय आणल्या बद्दल सभागृहात या आमदाराना दुषने देणारे सत्ताधारी पक्षाचे आमदार मेजवानीचा कार्यक्रम सुरलित पार पाडन्या साठी झटनार्या आमदाराचे कौतुक करीत होते.महाराष्ट्रातील ओल्या दुष्काला च्या पार्श्वभूमीवर झालेल्या या मेजवानी बद्दल कोणालाच खंत नव्हती!त्यांचे सोडा ते तर चोर चोर मौसेरे भाई आहेत.पण इतर भाई आणि साथीन्चा आवाज तरी कुठे ऐकू येतो?मोहिते पाटला विरुद्ध जिवाचे रान करणारे बाबा आढव आज का शांत आहेत?

शेती आणि सहकाराची वाताहत झाली तशीच मोहिते घरान्याचीही झाल्याचे आपण बघतोच आहोत.पण राजकारनाची शेती करणारी ही नवी घराणे संपन्नतेची नवी दालने पादाक्रांत करीत चालले आहेत.अशा मेजवान्या त्याना दारिद्र्याच्या खाइत लोटन्या ऐवजी सम्पन्नतेच्या शिखराकडे नेत आहेत.आता गड्करीचेच उदाहरण घ्या.सरसंघचालक देवरस यान्चेकडून स्वत:साठी पहिली सेकण्ड हैण्ड चारचाकी घेणारे गडकरी(ही माहिती मी श्री धनन्जय कर्णिक यांच्या 'उठाठेव 'या ब्लॉग वरून घेतली आहे.) अवघ्या काही वर्षात मुलाला लग्नाची भेट म्हणून महागडी गाड़ी देतात!मेजवानीच्या खर्चाच्या भाराने ते अजिबात वाकले नाहीत हेच या वरून स्पष्ट होते.उलट या मेजवानीने त्यांची बरीच ओझी हलकी केली असावीत.कोणत्याच बाबतीत आपण गोपीनाथ मुंडे पेक्षा कमी नाही,असलो तर काकनभर सरस आहोत हे या निमित्ताने स्वत:च्या पक्षातील नेत्याना दाखविता आले.शिवाय ते संघाला लग्नात राबवून घेतात तसे निवडनुकीतही राबवून घेवु शकतात याची जाणीव पक्षातील अन्य नेत्याना करून देण्यात तर ते कमालीचे यशस्वी झाले असतील!शक्ती आणि संपत्तीच्या या प्रदर्शनाला अन्ना हजारेना हजेरी लावायला लावून आपले सगळे वैभव वैध असल्याचा आभास निर्माण केला असे नव्हे तर वैधते वर अन्नांचे शिक्कामोर्तब करून घेण्यात ही गडकरी यशस्वी झालेतअसेच म्हणावे लागेल.आता हां अफाट आणि अचाट खर्च करण्यासाठी पैसा कोठून व कसा आला हे त्याना कोणी विचारूच शकत नाही!तर असा मोहिते ते गडकरी व्हाया मुंडे हां प्रवास.हां प्रवास या व्यक्तींचाच नाही.समाजाच्या संकल्पनात ,दृष्टीकोनात व मुल्यातील बदल अधोरेखित करणाराही हां प्रवास आहे.या लेखात व्यक्तींचा वा त्यांच्या पक्षाचा उल्लेख प्रासंगिक म्हणून अपरिहार्य होता.पण उड़दा माजी काले-गोरे काय निवडावे निवडनारे हेच खरे!--सुधाकर जाधव.(मोबाईल-९४२२१६८१५८). ssudhakarjadhav@gmail.com

pandharkawada ,dist.yavatmal.