Tuesday, August 17, 2010

सत्याच्या पलीकडले !

प्रिय मित्र , लोकसत्ता दैनिकात प्रकाशीत मुग्धा कर्णिक यांच्या 'गैरसोयीची असत्ये '(दि। २३-७-१०) व अभिजित घोरपडे यांच्या '..नव्हे सोयीची अर्धसत्ये'(दि। १२-८-१०) सही या मागची या लेखा वरील लोकसत्ताला पाठवित असलेली माझी प्रतिक्रिया ब्लॉगच्या माध्यमातून आपल्याकडे पाठवित आहे.या चर्चेत आपण योगदान द्यावे अशी या मागची भावना आहे.
--------सुधाकर जाधव.
'गैरसोयीची असत्ये' या मुग्धा कार्णिक यांच्या लेखाला पर्यावरणवादी अभिजित घोरपडे यानी '...नव्हे सोयीची अर्धसत्ये ' हां लेख लिहून दिलेले उत्तराने इतरांचा संभ्रम दूर होइल की नाही हे सांगता येत नसले तरी त्यातून त्यांचा संभ्रम मात्र स्पष्ट झाला आहे ! पर्यावरणाचे अभ्यासक आणि पर्यावरणवादी अशा दुहेरी भूमिकेतून त्यानी उत्तर देण्याचा प्रयत्न केल्याने त्यांचा स्वत:चा गोंधळ उडाला आहे. पर्यावरण क्षेत्रात असत्याचा जो बोलबाला सुरु आहे त्यावर कर्निकानी घेतलेल्या आक्षेपालाच त्यांचा आक्षेप दिसतो. कदाचित अशा आक्षेपांची जाहीर चर्चा होत राहिली तर सर्व सामान्यांचा पर्यावरणाचे काम करणारे कार्यकर्ते व संस्था यांच्या वरील विश्वास उडून जाइल याची चिंता त्याना असावी। मुग्धा कार्णिक यानी गोंधळ वाढविला या प्रतिपादनाचा हाच अर्थ निघतो.अन्यथा सत्याचा शोध घेणार्या अशा लिखाणाचे अभ्यासक म्हणून त्यानी स्वागतच केले असते।
पृथ्वीच्या वातावरणाचे तापमान व हवामानात सातत्याने बदल होतात आणि हे बदल नैसर्गिकरित्या होतात हे मुग्धा कार्णिक यांच्या लेखाचे मध्यवर्ती सूत्र आहे आणि ही बाब अभिजित घोरपड़े याना मान्य आहे! ओझोन बाबतीत कार्णिक यांच्या मताशी घोरपडे असहमति दर्शवितात हे खरे.पण ते कार्णिक ओझोनच्या थराला छिद्र पडले ,थर फाटल्या गेला हे वैद्न्यानिकानी केलेले संशोधन त्या अमान्य करीत आहेत या समजुतीतून। पण मुग्धा कार्णिक यानी त्यांच्या लेखात या संशोधनाला कोठेच आव्हान दिलेले दिसत नाही.ओझोन थरात सातत्याने बदल होतात आणि कधी कधी ते इतके विरळ होतात की त्याचे परिणाम तापमान बदल,हवामान बदल यातून दिसून येतात हे त्यानी मान्यच केले आहे आणि अभिजित घोरपडे सुद्धा या पेक्षा वेगले काहीच सांगत नाहीत.मतभेद फ़क्त इथेच आहे की ओझोनच्या आणि तापमान - हवामान बदलात निसर्गाचा किती हात आहे आणि मनुष्य जातीचा वाटा किती आहे? निसर्गाच्या भूमिके बद्दल ही कार्णिक आणि घोरपडे यांच्यात तसुभरही मतभेद नाहीत! कार्बन वायूच्या सुपरिनामा बद्दल व विपरीत परिनामाबद्दलही या दोघात एकमत आहे. ग्लोबल वार्मिंग साठी मानव किती कारणीभूत आहे या बाबतीत संशोधन सुरु आहे आणि निश्चित असे वैद्न्यानिक निष्कर्ष अद्याप काढता आलेले नाहित। वैद्न्यानिकात या बाबत मतभेद आहेत याचा अर्थ इतकाच होतो की दोन्ही बाजु अंधारात तीर मारीत आहेत। वैद्न्यानिक हमरी तुमरीवर येवून अवैद्न्यानिक चर्चा करीत आहेत। घोरपडे ज्याला गोंधळ म्हणतात तो हाच गोंधळ आहे।प्रत्यक्ष पुरावा नसला की परिस्थितिजन्य पुराव्याचा आधार घेवुन निकाल दिला जातो तसाच पर्यावरणाचा "निकाल" लावण्यात स्वत: वैद्न्यानिक मग्न आहेत एवढाच दोघांच्याही लेखात उल्लेख झाला त्या वैदयानिकांच्या निवेदनांचा अर्थ होतो.
वाढत्या औद्योगिकरनाने कार्बन वायुंचा उत्सर्ग वाढला आहे ही बाब खरी असली तरी या उत्सर्गाने ओझोनच्या थर फाटतो आहे हे सिद्ध झालेले नसताना पर्यावरणवादी कार्बन वायुचा बागुलबुआ उभा करून समाजात भयकंप निर्माण करीत आहेत हां आरोप या पार्श्वभूमीवर खरा ठरतो। पर्यावरणाच्या क्षेत्रात केलेल्या
कार्या बद्दल व बहुमोल (?) संशोधना बद्दल नोबेल पुरस्कार प्राप्त ख्यातनाम संस्थेत काम करणार्या वैद्न्यानिकानी हिमालायावारिल बर्फ वितलन्या संदर्भात केलेल्या नोंदीने जग भर खलबल उडवून दिली होती हां ताजा इतिहास आहे। हे संशोधन बिनबुड़ाचे आहे असे दाखवून दिल्या नंतर संस्था प्रमुखाला माफ़ी मागुन आपली विधाने परत घ्यावी लागली होती.जगाच्या अन्ताची तारीख घोषित करणारे भविष्यवेत्ते आणि पर्यावरणनाशाने जगबुडी होणार अशी हाकाटी करणारे पचोरी सारखे शास्त्रदय यांच्यात कसा फरक करता येइल हे घोरपडेनी समजुन सांगितले पाहिजे।ईश्वराच्या कोपाची भीती दाखवून भटजी मंडळी गोर गरीब शेतकरी -कस्टकरी जनतेला भटजी मंडळी काशी लुटतात याचे महात्मा फुलेनी प्रभावी वर्णन केले आहे.पर्यावरणवादी आधुनिक भटजी सर्व सामान्यात जग विनाशाची भीती निर्माण करून स्वत:ची तुम्बडी भरीत आहेत हेच पचोरी प्रकरनाने सिद्ध झाले आहे.फरक एवढाच की पूर्वीचे भटजी गोर गरिबाना लुबाडायाचे आणि आधुनिक भटजींची भूक मोठी असल्याने त्यांची नजर सयुक्त राष्ट्र किंवा बील गेट प्रतिष्ठान किंवा नोबेल यांच्या तिजोरी कड़े असते!या अंगाने मुग्धा कार्णिक यानी उपस्थित केलेल्या भयकम्पाच्या मुद्द्याकडे पाहिले की त्याचे महत्त्व लक्षात येते आणि ग्लोबल वार्मिंग ही संकल्पनाच प्रचारकी आहे हे पटले नाही तरी त्यांच्या तर्कात दम आहे हे पटते । "मोंट्रीयल करारा " संबंधी अभिजित घोरपडे यानी केलेला दावा तर निव्वळ हास्यास्पद आहे. ओजोनच्या थराला इजा करू शकतील असे हानीकारक वायु वातावरणात सोडन्याचे प्रमाण कमी कमी करण्या संबंधी अंतरराष्ट्रीय करार झाला असला तरी आजतागायत त्या कराराचे पालन कोणीही केले नाही। या कराराच्या अमलबजावनीस भारत-चीन सारख्या विकसनशील राष्ट्रांचा विरोध लपून राहिलेला नाही आणि या दोन देशात असे वायु वातावरणात सोडन्याचे प्रमाण सर्वाधिक आहे! ज्या प्रगत राष्ट्रानी हानीकारक वायू वातावरणात सोडून विकास साधला त्यानी सुद्धा भारत -चीनच्या नावे बोटे मोडीत बसण्याशिवाय काही केलेले नाही.करार झाल्याच्या दिवसापासून तो सर्वत्र अड़गलीत पडला असताना मोंतरीयल कराराने हानिकारक वायु वातावरणात सोडन्याचे प्रमाण कमी होवून ओझोन थराला झालेली हानी कमी झाल्याचे सांगणे हां सत्यालाप (खोटारडेपणाला पर्यायी सुसंस्कृत शब्द!) आहे.या पेक्षा सौम्य शब्द वापरायचा झाला तर 'सत्याच्या पलीकडले' असा शब्द वापरता येइल! ओझोन थराची हानी भरून निघाली असेल तर ती नैसर्गिकरित्याच निघाली .त्यात राष्ट्रप्रमुखांचा किंवा वैद्न्यानिकांचा वाटा शून्य आहे हे उघड आहे.
निसर्गत: जी हानी होते ती निसर्ग भरून काढतो.तसे झाले नसते तर ओझोनचे सुरक्षा कवच कधीच विरून गेले असते आणि सम्पूर्ण सजीव श्रुस्टी समाप्त झाली असती.पण मानवाने केलेली हानी भरून काढन्याचे सामर्थ्य सुद्धा निसर्गाकडे आहे याचा कोणताही पुरावा नाही.हानी भरून काढन्याची निसर्गा सारखी ताकद विद्न्यान मानवाला देत नाही तो पर्यंत असे वायु वातावरणात सोडन्यात सावधानता असायला हवी याबाबत दुमत असू शकत नाही। औद्योगिकरनाकडे पाठ फिरविने हां यावरचा उपाय नाही हे लक्षात घेवुन उपाय योजना करावी लागणार आहे.पण अशी उपाय योजना करण्यात सर्वात मोठा अडसर पर्यावरणवादी मंडळीचा अवैद्न्यानिक दृष्टीकोण ठरत आहे हे समजुन घेण्याची गरज आहे। प्रगती साठी ऊर्जा लागते आणि याच ऊर्जा निर्मिती पायी पर्यावरणाची हानी झाली आहे ,होत आहे। कोलसा,खनीज तेल व नैसर्गिक वायु यांच्या ज्वलनातुन प्रामुख्याने ही ऊर्जा प्राप्त होते व या प्रक्रियेत हानिकारक वायु वातावरणात पसरतात.उर्जेचे दुसरे स्त्रोत आम्ही निर्माण करीत नाहीत तो पर्यंत असेच चालणार आहे.खरी गरज उर्जेचे पर्यायी स्त्रोत लवकरात लवकर निर्माण करण्याची आहे।अणु ऊर्जा हां सर्वात मोठा पर्याय आज आपल्या समोर आहे.पण या पर्यायाला सर्वात प्रखर विरोध पर्यावरण वादीच करतात.ही ऊर्जा निर्माण होण्या आधीच या मंडळीला अणु कचरा विल्हेवाटीची चिंता लागली आहे.अणु केंद्रात अपघात झाला तर काय होवू शकते याच्या कल्पनेने ही जमात बेचैन आहे .पवन उर्जेच्या पर्याया बाबतही असेच आहे.या ऊर्जा निर्मिती प्रक्रियेत ढग निघून जातात आणि पाउस पडत नाही असा जावईशोध लावून पवन उर्जेच्या विरोधात आन्दोलन उभे करणारे हेच महाभाग आहेत.औष्णिक वीजेच्या तुलनेत दाभोल प्रकल्पातून निर्माण होणारी वीज पर्यावरनाला कमी हानीकारक असताना तो प्रकल्प बंद करण्यासाठी रस्त्यावर उतरून जीवाचे रान करणारे पर्यावरण वादीच होते। कागदाच्या गरजे पोटी कित्येक जंगले कापल्या गेली। अशा कागदांची गरज सम्पविनारे संगणक आले तेव्हा संगणक क्रांतीचा विरोध करण्यात हेच आघाडीवरआणि आता संगनक् वापरण्यातही आघाडी यांचीच!जंगल आणि खनिज
संपत्तीचा अमाप वापर होत आहे याचे महत्वाचे आणि मोठे कारण ही सम्पत्ती तिच्या मूल्या पेक्षा कमी किमतीत उपलब्ध होते हे आहे.पण या संपत्तीचे खरे मूल्य वसूल करण्यासाठी भाव वाढ केली तर विरोधाचा झेंडा यांच्याच खांद्यावर दिसेल.स्वच्छ व सुरक्षीत पर्यावरनाकडे जाणारा रस्ता रोखानार्या या जमातीला रोखल्या शिवाय पुढची वाट चाल कठीण आहे.मुग्धा कार्णिक या जमातीला विद्न्यान शिकवू शकतील ,पण वैद्न्यानिक दृष्टीकोण ज्याचा त्यालाच विकसित करावा लागणार आहे.पर्यावरणवादी जमात जगातील सर्वात शहाणी जमात समजली जात असल्याने त्याना वैद्न्यानिक दृष्टीची गरजच काय असा प्रश्न कोणी उपस्थीत केला तर त्याचे मात्र माझ्याकडे उत्तर नाही!
--सुधाकर जाधव
भ्रमणध्वनी - ९४२२१६८१५८

1 comment:

  1. Dear Mr Jadhav,
    Thanks for sending your article. I agree with some aspects of your article especially about having a larger debate on the climate science, dual standards of developed countries etc. However, one has to understand the political economy of the differing arguments. Most of the climate rebuttal studies have been directly or indirectly funded by the oil and coal corporations, which explains a lot of things. Anyway, will be happy to provide more information if you desire.


    Best,
    Nikit


    Nikit Abhyankar
    Emmett Interdisciplinary Program in Environment and Resources.
    Stanford University.
    http://e-iper.stanford.edu
    Tel (C): 650-644-7178

    ReplyDelete