Tuesday, April 5, 2011

मा.अण्णा हजारे याना खुले पत्र!










"आपल्या उपोषनाने या हताश आणि निराश देशाच्या डोळ्यात अंधुकशी आशेची चमक दिसू लागली आहे.देशाने क्रिकेटचा विश्वकप जिंकला ही नव्हे तर तुम्ही प्राणाची बाजी लावून निर्माण केलेली अन्धुकशी आशा ही भारतासाठी या दशकातील सर्वात मोठी संस्मरनीय घटना आहे.देशवासियांच्या डोळ्यात निर्माण झालेल्या किंचितशा चमकेचे चिन्गारीत रूपान्तर करण्याची आज खरी गरज आहे."










                                                        
मा.अण्णा हजारे याना खुले पत्र!























माननीय अण्णा हजारे ,

स.न.वि.वि.

                   आपले उपोषण सुरु झाल्या नंतर आपणास हे पत्र लिहित आहे.पण हे पत्र आपणास प्राप्त होइल तेव्हा आपल्या उपोषनाची यशस्वी सांगता झाली असेल अशी खात्री वाटते.अण्णा,आपला देश जगातील सर्वात तरुण देश असल्याचे बोलले जाते .तरुण वयोगटातील सर्वाधिक मनुष्यबळ आपल्याकडे असल्याचे अभिमानाने सांगितले जाते .अशा या तरुण देशाच्या समस्या सोडविन्यासाठी आपल्या सारख्या वयोवृद्ध व्यक्तीला आपले प्राण पणाला लावावे लागत्तात याची या तरुण देशाला लाज वाटायला हवी होती. खरे तर या तरुण देशाने म्हणायला पाहिजे होते,"अण्णा ,या वयात तुम्ही आराम करा.देशाला लुटनाऱ्या व् लुबाडनाऱ्या   सर्वाना आम्ही सरळ करतो!" पण असा आश्वस्त  करणारा आवाज काही कोणत्या कोपऱ्यातुन  ऐकू आला नाही.शेवटी तुम्हालाच प्राणाची बाजी लावावी लागली.
              
            गेल्या काही कालावधी पासून सारा भारत अस्वस्थ आहे.राज्यकर्त्याच्या भ्रस्टाचाराच्या,दुराचाराच्या नित्य नव्या कथानी देश सुन्न आणि संतप्त झाला आहे.आपला देश लाचखोराना चरण्याचे मुक्त कुरण बनल्याने देशाचा अभिमान वाटण्या ऐवजी देशवासियाना हताशा व् निराशेने ग्रासले आहे.आपल्या उपोषनाने या हताश आणि निराश देशाच्या डोळ्यात अंधुकशी आशेची चमक दिसू लागली आहे.देशाने क्रिकेटचा विश्वकप जिंकला ही नव्हे तर तुम्ही प्राणाची बाजी लावून निर्माण केलेली अन्धुकशी आशा ही भारतासाठी या दशकातील सर्वात मोठी संस्मरनीय घटना आहे.देशवासियांच्या डोळ्यात निर्माण झालेल्या किंचितशा चमकेचे चिन्गारीत रूपान्तर करण्याची आज खरी गरज आहे.सरकार लोकपाल बील स्वीकारते की नाही यावर तुमच्या उपोषनाचे यशापयश अवलंबून असल्याचा समज तुम्ही किंवा इतर  कोणीही करण्याची गरज नाही.तुमच्या उपोषनाने ज्या क्षणी निराश आणि हताश देशवासियात किंचित का होईना आशेचा भाव जागृत झाला त्या क्षणीच तुमचे उपोषण यशस्वी झाले.त्या क्षणाच्या  पुढे उपोषण लाम्बविने म्हणजे शरीराला विनाकारण यातना दिल्या सारखे व् कालापव्यय केल्या सारखे होइल.वेळ दवडून चालणार नाही .कारण निर्माण झालेली अंधुकशी आशा लोप पावू द्यायची नसेल तर तुम्ही उपोषण मंडपात असण्या ऐवजी या क्षणी जनतेत असणे गरजेचे आहे.जन लोकपाल बिलाच्या निमित्ताने उपोषण केल्याने जे साध्य झाले आहे ते प्रत्यक्ष जन लोकपाल विधेयक संसदेने मंजूर केले तरी साध्य होणार नाही.

                या देशात बोकाळलेला भ्रष्टाचार एखादा कठोर कायदा करून संपणारा नाही.कितीही परिपूर्ण कायदा केला तरी त्या कायद्या सोबत पळवाट असतेच.विद्न्यान आणि तंत्रद्न्यान क्षेत्रातील 
संशोधनात आम्ही कितीही मागे असलो तरी कायद्यात पळवाटा शोधण्यात आणि निर्माण करण्यात
आमचा विशेषत: आमच्या देशातील नोकरशाहीचा हातखंडा आहे.आपल्याच प्रयत्नातून निर्माण झालेल्या क्रांतीकारी माहिती अधिकाराच्या कायद्याच्या बाबतीत नोकरशाहीचा काय दृष्टीकोण आहे आणि त्या कायद्याची अमलबजावणी करण्यात किती कुचराई नोकरशाही करते हे जगजाहीर आहे.जन लोकपाल बिल पूर्णत: नोकरशाहीवर अवलंबून असल्याने त्यातून काय साध्य होइल हे एखादा कुडमुडया ज्योतीषीही सांगू शकेल.सांगायचे तात्पर्य एवढेच आहे की अशा निरर्थक कायद्यासाठी तुम्ही
आमच्या साठी बहुमोल असलेले तुमचे प्राण अजिबात पणाला लावू नयेत.

             आता या जन लोकपाल विधेयकाचा विषय निघालाच आहे तर लहान तोंडी मोठा घास घेतल्याचा आरोप होण्याची शक्यता लक्षात घेवुनही त्यातील त्रुटी व् विपरीतता आपल्या निदर्शनास
आणून देण्याचे धाडस करीत आहे.राज्यकर्तेच ,यात नोकरशाहीही आलीच,ठग आणि लुटारू बनल्याने
देशाचे अतोनात आर्थिक नुकसान झालेच ,पण त्याही पेक्षा सर्वात मोठे नुकसान झाले ते म्हणजे देशातील राज्यव्यवस्थे वरचा लोकांचा विश्वास उडाला.लोकांचा असा विश्वास उड़ने म्हणजे अराजकाला व् हुकुमशाहीला निमंत्रणच आहे.भ्रस्टाचाराने झालेले आर्थिक नुकसान कसेही भरून काढता येइल अगदी तुमच्या लोकपाल बिलातील शिक्षे पेक्षा कड़क अशी काही इस्लामी राष्ट्रात प्रचलित असलेली
फटक्याची शिक्षा देवून घशात घातलेला पैसा बाहेर काढता येइल,पण यातून लोकांचा राजकीय व्यवस्थे वरील विश्वास पुनर्स्थापित करता येणार नाही.या जन लोकपाल  बिलातील सर्वात मोठी त्रुटी कोणती असेल तर ती ही आहे की यातून असा विश्वास पुनर्स्थापित तर होत नाहीच ,उलट यातील तरतुदी राजकीय व्यवस्थे बद्दलचा आकस व् अनादर दर्शविनाऱ्या आहेत .जन लोकपाल बिलातील ही सर्वाधिक घातक व् आक्षेपार्ह बाब आहे.लोकानी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधिना लोकपाल निवडीच्या  प्रक्रियेतून जाणून बुजुन बाजुला टाकण्यात आले आहे.निवडून आलेले प्रतिनिधी भ्रष्ट असतात आणि निवडनुकीला सामोरे न जाता उच्च पदावर
बसलेले व्यक्ती स्वच्छ चारित्र्याचे असतात अशी खुळचट व् भ्रामक समजूत यातून दृढ़ होते.वास्तविक या विधेयकाच्या कर्त्या पैकी एक वकील प्रशांत भूषण हे न्याय व्यवस्थेत सर्वोच्च पदी असणारे किती भ्रष्ट होते हां त्यांच्याच पित्याने केलेला आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावे बाळगुण आहेत.तरीही लोकपाल निवडीत वरीस्ठ न्यायाधिशाना मानाचे स्थान आहे.मात्र देशाच्या पन्तप्रधानावर त्यानी भ्रस्टाचारी मंत्र्यावर कारवाई केली नाही असा आरोप झाल्याने त्याना मात्र लोकपाल निवडीत स्थान नाही!एकुणच लोकशाही संस्थाना गौण लेखण्याचा आक्षेपार्ह प्रयत्न या विधेयकात करण्यात आला आहे.एकीकडे  देशातील जनतेने निवडलेल्या प्रतिनिधी बद्दल अविश्वास आणि  अनादर तर दुसरीकडे परदेशी नागरिकांच्या निवडबुद्धीवर आदरयुक्त विश्वास या विधेयकातुन व्यक्त होतो.महात्मा गांधीना नोबेल पुरस्कारासाठी अपात्र  मानणारी स्वीडनची नोबेल पारितोषक समिती लोकपाल निवडी साठी सदस्य निवडू शकणार आहेत!भारताचे नागरिक नसलेले,भारताशी काडीचाही सम्बन्ध  नसणारे पण अपघाताने भारतीय वंशाचे असलेले नोबेल पारितोषक विजेते भारताच्या लोकपाल निवडीत हे विधेयक मंजूर केले तर महत्वाची भूमिका बजावतील.महात्मा गांधीना नोबेल नाकारणारे तर परकीय होते ,पण महात्माजी आज हयात असते तर या विधेयकानुसार त्याना लोकपाल देखील होता आले नसते!कारण कधी तरी राजकीय पक्षात असणे हे लोकपाल बनण्यासाठी अपात्र मानले गेले आहे.या विधेयकाने राजकीय अस्पृश्यतेला मानाचे स्थान दिले आहे.आदरणीय अण्णा , या विधेयकातील ही सर्वाधिक गंभीर आणि आक्षेपार्ह बाब असल्याने विस्ताराचा धोका पत्करून तुमच्या समोर मांडली आहे.या विधेयकात इतरही अनेक त्रुटी आहेत पण त्याच्या खोलात जाण्याची आत्ताच गरज नाही.हे विधेयक अगदी टाकाऊ व् भ्रष्टाचार निर्मुलनाच्या दृष्टीने निरुपयोगी असले तरी हे विधेयक पुढे रेटन्याच्या प्रक्रियेत जे जन जागरण झाले व् लोकांची लढ़न्याची  मानसिक तयारी झाली ही सर्वात मोठी उपलब्धी आहे.म्हनुनच अशा विधेयका कडून लोकांच्या अपेक्षा वाढून त्यांचा भ्रमनिरास होवू द्यायचा नसेल तर लोक अभिक्रमातुन भ्रष्टाचार निर्मूलन कसे होइल याची दिशा दाखविनारा कार्यक्रम देण्याची आज खरी गरज असल्याचे आपल्याला पटेल. 

         या संदर्भात पूर्वीच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात समोर आलेल्या एका महत्वाच्या कार्यक्रमाकडे
मी आपले लक्ष वेधू इच्छितो.आपल्या आधीचे या देशातील भ्रष्टाचार विरोधी सर्वात मोठे जन आन्दोलन लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली झाले होते.जयप्रकाशजींचे आन्दोलन आणि आपले आन्दोलन या दोन आन्दोलना मधल्या कालखंडात भ्रष्टाचार विरोधी लढा उभा न राहिल्याने भ्रस्टाचारात प्रचंड वाढ झाली.या वाढीचे इतरही अनेक कारणे आहेत ,पण हे महत्वाचे कारण असल्याचे मान्य करावे लागेल.१९७४च्या त्या आंदोलनाची आपल्या सारखीच धारणा होती की सत्तेचे सर्वोच्च केन्द्रच भ्रस्टाचाराची गंगोत्री असते आणि या उगम स्थानावर प्रहार केल्या शिवाय भ्रष्टाचार निर्मूलन अशक्य आहे.सत्ता हीच सत्तास्थानी असनाऱ्याची सर्वात मोठी कमजोरी असल्याने ती हातातून जाणार नाही याची दक्षता ते घेत असतात.म्हनुनच लोक प्रतिनिधीना परत बोलावन्याचा अधिकार लोकांना असला पाहिजे ही त्या आंदोलनाची महत्वाची मागणी होती.कोणत्याही गैर कृत्याला जबाबदार धरून लोक प्रतिनिधीला परत बोलावन्याचा अधिकार लोकांना मिळाला तर लोक प्रतिनिधीची लोकाप्रती अनास्था व् सत्तेचा दुरूपयोग करण्याची वृत्ति नस्ट  होइल यावर दुमत होण्याचे कारण नाही.म्हनुनच १९७४च्या लोक आंदोलनाचा हां धागा पकडून पुढे जाता आले तर भ्रष्टाचार विरोधी लढाइला बळ आणि हत्यार मिळेल.लोक प्रतिनिधिना परत बोलावन्याचा अधिकार मिळविण्याच्या लढाइने भ्रस्टाचाराला लगाम लागेलच शिवाय लोकांचा लोकशाही व्यवस्थेवरिल विश्वास दृढ़ होइल.कायदा किंवा नोकरशाहा यांच्यावर अवलंबून न राहता जन अभिक्रमातुन भ्रष्टाचार निर्मूलन शक्य होइल.जन लोकपाल बिल मंजूर झाले किंवा न झाले तरी काही फरक पडणार नाही.ते बिल पुढे करून जे साध्य करायचे होते ते साध्य झाल्याने आता त्यावर शक्तीपात न करता लोक प्रतिनिधीना परत बोलावान्याच्या  अधिकाराची मागणी रेटून भ्रष्टाचार विरोधी लोक लढा उभारन्यावर लक्ष केन्द्रित करण्याची गरज आहे.

             अण्णा, तुम्हाला वाटेल की माझ्या तुमच्याकडून असलेल्या अपेक्षांचे शेपुट लाम्बतच चालले आहे.तरी सुद्धा आणखी एक बाब तुमच्या लक्षात आणून देण्याचा मोह मला आवरत नाही.आपल्या निरिक्षनातुन हे लक्षात आले असेल की सत्तास्थानी असलेले व्यक्ती अनैतिक आहेत म्हणून भ्रष्टाचार करीत नाहित.भ्रष्टाचार करण्याच्या अमाप वाटा त्यांच्या समोर असतात आणि स्वाभाविकपणे  त्या वाटेवर चालण्याचा मोह त्याना होतो.बेदाग़ व्यक्तित्व ही कवी कल्पना आहे.आर्थिक व्यवहाराशी सम्बद्ध नसलेला माणूसच तसा असण्याची शक्यता अधिक असते.म्हनुनच पूर्वी सर्व संग परित्याग ही रूषी-मुनी बनण्याची पूर्व अट असावी!आपल्या हे ही लक्षात आले असेल की राजसत्तेच्या हातात असलेली आर्थिक सत्ता हीच भ्रस्टाचाराची जननी आहे.भूखंड वाटप हे सत्ताधाऱ्याच्या हातात असल्याने तिथे भ्रष्टाचार होतो.सत्तेचा आणि व्यापाराचा सम्बद्ध आला की भ्रष्टाचार होतोच हे सिद्ध झालेले समीकरण आहे.अर्थ व्  व्यापाराचे क्षेत्र आणि सरकार यांची फारकत करने हाच भ्रष्टाचार निर्मुलनाचा जालीम उपाय असेल तर तो स्वीकारण्याची तयारी भ्रष्टाचार विरोधी लढाइतील  लढ़वय्यानी  तयारी ठेवली पाहिजे. 
                                        (समाप्त) 
सुधाकर जाधव 
मोबाइल-९४२२१६८१५८ 
पांढरकवडा  , जि.यवतमाळ

-------------------------------------

"कोणत्याही गैर कृत्याला जबाबदार धरून लोक प्रतिनिधीला परत बोलावन्याचा अधिकार लोकांना मिळाला तर लोक प्रतिनिधीची लोकाप्रती अनास्था व् सत्तेचा दुरूपयोग करण्याची वृत्ति नस्ट  होइल यावर दुमत होण्याचे कारण नाही.म्हनुनच १९७४च्या लोक आंदोलनाचा हां धागा पकडून पुढे जाता आले तर भ्रष्टाचार विरोधी लढाइला बळ आणि हत्यार मिळेल."

---------------------------------

5 comments:

  1. i wrote on facebook:
    LOKPAL is a magic box!he is a law maker,to
    implement laws he becomes law enforcement agency i.e.police .this police has a authority to issue arrest and search warrent by its whim. when he make arrests, he become a judge to punish them!every thing under one roof!!!!!!!!
    and if you dare to raise eye brows to his authority he can punish you under out dated CONTEMPT OF COURT law!

    ReplyDelete
  2. Vinay Hardikar to me



    Generally agree with your line; but we have to look for a novel modus operandi.

    ReplyDelete
  3. Sanjeev Khandekar to me



    you always write right things in right perspective, why don't you start your column in Loksatta or lokmat.. ..?
    Thanks.

    ReplyDelete
  4. देशाच्या डोळ्यात अंधुकशी आशेची चमक दिसू लागली आहे,यात "आशेची चमक" एवढेच फ़क्त खरे आहे. आशेचा किरण आणि प्रत्यक्षात सुर्यदर्शन फ़ारफ़ार लांब आहे. अण्णाच्या आंदोलनाला माझेही समर्थन आहे; पण या आंदोलनातून फ़ारसे काही साध्य होईल असे वाटत नाही.

    http://gangadharmute.wordpress.com

    ReplyDelete
  5. What we should aim to achieve is morality in our population at large, we have to aim at a society where morality is respected, revered. We talk of offering BharatRatna to a Sachin Tendulkar because he plays great cricket, why do not we revere those authorities who have managed to remain without a blemish during their time of authority when there were abundant opportiunities for them to go corrupt. No law can ever enforce morality, it only subverts the criminal tendencies. If there could be a time in human history where virtuosity is respected, there would not have been a need to make a law for it! This seems to be an impossible aim, since human beings are fallible by virtue of there basic nature & instinct; hence whether it be a Buddha, Gandhi, Mandella, Lincoln, it has not made any difference in human behaviour

    ReplyDelete