Sunday, July 25, 2010

हंगामा है क्यों बरपा.......!

माझ्या तरुणपनी "हंगामा है क्यों बरपा थोडीसी जो पी ली है ..."या गुलाम अलीने गायलेल्या गझलेने मला व माझ्या मित्राना अक्षरश: वेड लावले होते आणि तेहि आम्ही दारू बन्दीचे समर्थक असताना! आज ही गझल पुन्हा एकदा आठवन्याचे कारण आहे धान्यापासून मद्य निर्मितीवर सुरु असलेला हंगामा . दारू ढोसनारेच नशेत तर्काला सोडून बोलतात ही आपली पारम्पारिक समजूत.पण दारू न पिणारे सुद्धा नशेत असल्या सारखे बोलू शकतात यावर शिक्कामोर्तब करणारा हां वाद आहे.धान्या पासून मद्य निर्मितीचा किल्ला लढ़विनारे माझे मित्र अजित नरदे दारू पीत नाहीत आणि मद्य निर्मितीचा किल्ला ध्वस्त करायला निघालेले माननीय ठाकुरदासजी बंग , न्या.धर्माधिकारी,अन्नासाहेब हजारे ,नरेंद्र दाभोलकर , अनिल अवचट आणि या लढाई चे सेनापती असलेले डॉ.अभय बंग या सर्व सन्माननीय महानुभवाना तर दारू हां शब्द ओठातून उच्चारने देखील वेदनादायी ठरत असेल. स्पर्श तर फार दूरची बाब आहे! तरीही मद्य निर्मितीच्या प्रश्नावर ज्या अभिनिवेशाने तर्काला सोडून हे महानुभव बोलत आहेत ते बघून एखाद्या मद्यपीच्या बोलण्याची आठवण झाल्या शिवाय राहात नाही.कारण दोन्ही कडच्या मांडनी मधे भरपूर असंबद्धता आहे.
श्री अजित नरदे यानी धान्या पासून दारू निर्मिती करणे दारिद्र्यात असलेल्या ज्वारी व बाजरी उत्पादकान्साठी कसे फायदेशीर ठरू शकते याचे अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे.पण त्यांचा स्वत:चाच आपल्या अभ्यासपूर्ण प्रतिपादनावर विश्वास नसावा किंवा धान्या पासून मद्यनिर्मितीला विरोध करणारे पुरते नामोहरम व्हावेत यासाठी त्यांच्या वस्त्रहरनाचा प्रयत्न केला.डॉ.अभय बंग यांच्या बाल म्रत्यु रोखण्याच्या प्रयत्न व प्रयोगा पासून ते दाभोलकरांच्या अंध श्रद्धा निर्मुलनाचे कार्य व साने गुरुजींचे साधना साप्ताहिक चालविन्याचा प्रयत्न यावर अजित नरदे कारण नसताना घसरले. तसे पाहायला गेले तर कोणत्याही विषयाची आकडेवारी कधीच विश्वनीय नसते.मुद्दा सिद्ध करण्याच्या नादात हवा तसा आकड्यांचा खेळ करता येतो हे श्री नरदे ज्यांचा आधार घेतात त्या डॉ.श्याम अस्टेकराना देखील माहीत आहे.अगदी श्री नरदे जे आकडे पुढे करतात त्याला छेद देणारे आकड़ेही पुढे केले जावू शकतात.पण आकड्यांच्या अशा खेलाने श्री नरदे यांचे प्रतिपादन चुकीचे ठरत नाही व डॉ.बंग दाम्पत्यानी केलेल्या ऐतिहासिक प्रयत्नाचे मोल कमी होत नाही.मद्य निर्मितिला विरोध कैला म्हणून समाजातील अंधश्रद्धा निर्मुलनाचा दाभोलकराचा प्रयत्न कवडीमोल ठरत नाही हे नरदे यानी ध्यानी घ्यायला हवे होते. सर्वश्री ठाकुरदास बंग,न्या.चंद्रशेखर धर्माधिकारी आणि अन्ना हजारे यांचे सामाजासाठीचे योगदान मोलाचे आहे.त्याना दाम्भिक म्हनने हे त्यानी केलेल्या योगदानाची अवहेलना करण्या सारखे आहे. दारू मुक्त समाजाचे स्वप्न पाहने हा दाम्भिकपना होत नाही. याला स्वप्नरंजन म्हणता येइल.तसे ते स्वप्नरंजन आहे हे नरदे यानी दाखवूनही दिले आहे.समजा असा दारू मुक्त समाज निर्माण झाला तर नरदे याना नक्कीच आनन्द होइल. आपला समाज ज्या देव-देवतांची पूजा करतो त्या देवताना दारू प्रिय असली तरी आपल्या समाजात दारूला कधीच प्रतिष्ठा नव्हती.कथीत उच्चभ्रू समाजाचा अपवाद वगलता दारूला सामाजिक पेय म्हणून आजही मान्यता नाही.असे असुनही आम्ही दारु मुक्त समाजापासुन अनंत मैल दूर आहोत.दारू बंदी उद्दिष्ट आणि त्या दिशेने वाटचाल या बाबतीत सरकारने आपली विश्वासार्हता कधीच गमावली आहे .दारू उत्पादन व विक्री प्रक्रियेचे प्रत्यक्ष लाभ हे सरकारात सामील लोकांना मिळत असल्याने आणि एवढेच नाही तर दारुच्या व्यक्ती वा समाजावरिल विपरीत परिनामाचे लाभार्थी सुद्धा हीच मंडळी असल्याने दारू बंदीच्या दिशेने पाऊले उचलन्यास सरकार अनुत्सुक व अप्रामानिक असणार हे उघड आहे.त्यामुळे सरकारने विश्वासार्हता गमावलि यात आश्चर्य वाटन्या सारखे काहीच नाही.नवल आहे ते दारू बंदी बाबतीत सामाजिक संघटना व सामाजिक कार्यकर्ते यांची विश्वासार्हता कमी कमी होत चालल्याची.दारू बंदीच्या ध्येया प्रति प्रामाणिक असुनही हे घडते आहे कारण त्यांच्या चुकीच्या कल्पना व चुकीच्या माहिती आधारीत अशास्त्रिय व अतर्कसंगत प्रयत्न! याचा सर्वात मोठा आणि महत्वाचा पुरावा म्हणजे उपरोल्लेखीत महाराष्ट्रातील थोर समाजसेवकानी धान्यापासुन मद्य निर्मितीला विरोध करन्या साठी उघडलेली मोहीम ! यासम्बन्द्धी डॉक्टर अभय बंग यानी जाहीर केलेली भूमिका आणि या सर्व समाजसेवकानी या संदर्भात मुख्यमंत्री महोदयाला लिहिलेले पत्र प्रमाण मानून मी हे विवेचन करीत आहे.
या महानुभवांचे निवेदन गोंधलातच टाकणारे नव्हे तर चक्रावुन टाकणारे आहे.जोडीला भितीचा मोठा बागुल्बुवा उभा केला आहे.स्वत:च्या प्रतिपादनाच्या विरोधात जाणारे तर्क कौशल्याने वापरून सामन्यांच्या समज शक्तीलाच आव्हान दिले आहे.हे आव्हान स्विकारन्या ऐवजी सामान्य माणूस अचम्बित होवून विचार करन्याचे सोडुन विभूती सम व्यक्ती सांगताहेत तर खरेच असले पाहिजे असे मानून हात वर करणार यात शंकाच नाही.धान्या पासून मद्य निर्मितीतुन अन्न सुरक्षेला मोठा धोका निर्माण होणार ही अनेक चिंता पैकी सर्वात महत्वाचि चिंता या महानुभवाना वाटत असल्याचे त्यांच्या निवेदना वरून दिसते.अन्न सुरक्षा हा नक्कीच महत्वाचा प्रश्न आहे.धान्या पासून मद्य निर्मिती केल्याने अन्न सुरक्षा धोक्यात येणार असेल तर आधीच सावध केल्या बद्दल या महानुभवान्चे नक्कीच कौतुक करावे लागेल.पण खरी परिस्थिती काय आहे? ? ज्वारी आणि बाजरी या धान्या पासून मद्य निर्मितीची योजना आहे.या पिकाना बाजारात माती मोल भाव आहे.या धान्याचे उत्पादक नेहमीच दारिद्र्यात रहात आले आहेत.शिवाय या धान्याला जे पिकवितात त्यांच्या पलीकडे खान्या साठी मागणी नाही.उत्पादक शेतकरी आनंदाने नाही तर मजबुरीने ज्वारि-बाजरीची भाकर खातो.त्याच्याच शेतावर काम करणारा मजुर सुद्धा ज्वारी-बाजरी खात नाही.म्हणून खान्या साठी या धान्याचा उपयोग नाही.निवेदनात सरकारने हे धान्य विकत घेवून राशन दुकानातून विकावे असा सल्ला आहे.पूर्वी रशन दुकानात ज्वारी असायची आणि दारिद्र्य रेशे खालील व्यक्ती सुद्धा ती उचलायला तयार नसल्याने गोदामात खराब होवून सरकारला मोथे नुकसान सहन करावे लागायचे हा फार जुना इतिहास नसतानाही निवेदन कर्त्याला त्याचा विसर पडलेला दिसतो . ज्या पिकाना खाण्यासाठी मागनीच नाही त्यांचा अन्न सुरक्शे साठी काय उपयोग? तसेही या पिकांचे क्शेत्र फार मर्यादित आहे.1% पेक्षाही कमी कृषी योग्य जमिनीत हे पीक घेतले जाते.अन्न सुरक्शे साठी ही बाब अगदीच नगन्य आहे. खान्या साठी मागणी नसलेले व बाजारात मोल नसलेले हे धान्य मद्य निर्मिती साठी वापरल्याने धान्य उत्पादक शेतकरी दारिद्र्यातुन बाहेर पडू शकतो. या विचारवंतानी अन्न सुरक्षा व दारू निर्मिती याची सांगड घालून गल्लत केली हे उघड आहे.अन्न सुरक्षा धोक्यात येनार आहे ती धान्यापासुन मद्य निर्मितीतुन नव्हे तर जनुकिय बियानांच्या बाबतीत कथित पर्यावरणवादी व गांधी वादी विचारवंताच्या चुकीच्या भूमिकेने.विषम व चंचल हवामानाचा मुकाबला करण्याची व प्रचंड लोकसंखेची धान्याची गरज भागविन्याची क्षमता फक्त जनुकिय बियानात आहे हे सत्य स्वत:ला "सत्याचा शोध घेनारे" समजनारे समजतील तेव्हा अन्न सुरक्शाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा दूर होईल.

धान्या पासून मद्य निर्मितीला विरोध करताना या विभुतीनी आणखी एक महत्वाचे कारण पुढे केले आहे.त्यांच्या मते यामुळे दारूचा महापूर येवून अक्खा समज व्यसनाधीन होईल.मद्य निर्मिती विरोधी मोहिमेचे सेनापती म्हणून मी ज्यांचा उल्लेख केला त्या अभय बंग यानी जी आकदे मोड केली आहे त्या आधारेच ही भीती निराधार व निरर्थक असल्याचे सिद्ध होते. धान्या पासून मद्य निर्मितीला विरोध करताना या विभुतीनी आणखी एक महत्वाचे कारण पुढे केले आहे.त्यांच्या मते यामुळे दारूचा महापूर येवून अक्खा समज व्यसनाधीन होईल.मद्य निर्मिती विरोधी मोहिमेचे सेनापती म्हणून मी ज्यांचा उल्लेख केला त्या अभय बंग यानी जी आकदे मोड केली आहे त्या आधारेच ही भीती निराधार व निरर्थक असल्याचे सिद्ध होते. त्यांनी केलेल्या गनिता प्रमाणे धान्या पासून मद्य निर्मितीचा खर्च 200 रुपये प्रति लिटर च्या पुढे येतो.सरकारची 10 रुपयाची सबसिदी गृहित धरली तरी हे मद्य बाजारात किमान 250 रुपये प्रति लिटर भावाने विकले जाईल हे सुद्धा डॉक्टर बंग यांना मान्य आहे.सर्व सामान्यांच्या अवाक्या बाहेरच हे मद्य असणार हे उघड आहे. शेतकरी एवढी महाग दारू पितील असे म्हणणे म्हणजे शेतकरी वर्गाच्या दारिद्र्याची क्रूर चेस्ता करन्या सारखे आहे.ज्या दिवशी ज्वारी-बाजरी पिकविनारा दरिद्री शेतकरी ही दारू पिण्याच्या स्थितीत येईल त्या दिवशी त्यांच्याच नव्हे तर देशातील दारिद्र्याचा अंत झालेला असेल! याचा ग्राहक पंच तारांकित असणार हे नक्की.दारु पिन्याने गौर गरिबांचे जीवनच उद्ध्वस्त होते.पंच तारांकिताना गरीबी कोनत्याच कारणाने शिवत नसल्याने त्यांच्या पिन्यावर कोनाचाच आक्शेप नसतो.परकीय चलन खर्च करुन दारू पिनारे हे महाभाग या देशी पर्याया कडे आकर्षित झाले तर परकीय चलन वाचून अर्थ व्यवस्थेचा फायदाच होईल. या दारूचा महापूर सोडा ही दारू सामान्य दारु प्रेमिना बघायला मिळाली तरी ते खूष होतील!महत्वाची बाब म्हणजे ज्यांना प्यायची आहे त्यांच्या साठी आज दारू सहज उपलब्ध आहे.त्या अर्थाने दारूचा महापूर आज आहेच.पण म्हणून सगळा समाज व्यसनी बनून गुन्हेगार झालेला नाही. दारुचे दुस्परिनाम नक्कीच आहेत.पण समाजातील सर्व दु:खाना ,समस्याना दारू कारणीभूत आहे असे मानने अतिरंजीतच नव्हे तर हास्यास्पद आहे.
दारूच्या नशेत कायदेशीर व जबाबदार व्यवहार करता येत नाही असा एक मुद्दा या निवेदनात आहे.कदाचित हे म्हणणे बरोबरही असेल.पण यातून ध्वनीत होणारा दुसरा अर्थ -दारू न पिनारे कायदेशीर व जबाबदार व्यवहार करतात -साफ चुकीचा आहे. गुजरात राज्यात प्रदिर्घ काळा पासून दारू बंदी आहे.तरीही त्याच राज्यात स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वाधिक बेजबाबदार आणि बेकायदेशीर आणि घ्रुनास्पद गुन्हेगारी वर्तन अक्ख्या जगाने बघितले आहे. या वर्तनाने पीडीत असहाय माणसे आसरा शोधण्यासाठी महात्मा गांधींनी स्थापन केलेल्या साबरमती आश्रमा जवळ आले तर त्याना आत न घेता आश्रमाची दारे बंद करणारे दारू बंदीचा उदो उदो करनारेच होते.तेव्हा कायदेशीर व जबाबदार वर्तन याचा दारू पीने वा न पीने याच्याशी फारसा सम्बध नसतो हे उघड आहे.

दारू पीन्याने उत्पादकता कमी होते असाही दावा रशियाचा दाखला देवून या निवेदनातुन करण्यात आला आहे.रशियात साम्यवादी राजवट होती तेव्हाही जवळ जवळ संपूर्ण रशिया व्होदका पिनारा होता व आज ही तो दारुच्या बाबतीत तसाच आहे.साम्यवादा कडून उदारवादा कडे संक्रमन होण्याच्या काळात स्वातंत्र्याचा पहिल्यांदा उपभोग घेण्याची संधी प्राप्त झाल्याने काही काळ तेथील उत्पादन घसरले होते हे खरे.पण आता तेथील उत्पादनही वाढते आहे आणि दारूचा खपही!रशियात दारुच्या आयातीत व्रुद्धी झाल्याचे जग जाहीर आहे.यूरोप-अमेरिका दारू सेवना सोबत उत्पादकतेत सुद्धा आघाडीवर आहेत.त्यांची उत्पादकता जेथे अजिबात दारूची उप्लब्धता नाही अशा मुस्लिम देशा पेक्षा किती तरी अधिक आहे. चुकीचे दाखले देवून आपल्या देशात दारुबंदी साठी अनुकुलता निर्माण होईल अशी या महानुभवांची चुकीची समजूत झालेली दिसते.
दारु पिन्याला मी माणसाच्या स्वातंत्र्याशी अजिबात जोडत नाही .आपल्या देशातील अनुभव असा आहे की दारूने संपूर्ण कुटुंबच देशोधदीला लागते.दारु पिण्याचे स्वातंत्र्य घेणारा कुटुंबातील अन्य सदस्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालत असतो-विशेषत: स्त्री सदस्याच्या!म्हणूनच स्वातंत्र्याच्या नावावर शेतकरी संघतनेचे नेते दारुचे समर्थन करीत असले तरी शेतकरी महिला सदैव दारु बंदीला अनुकूल दिसतील.मात्र सध्या दारु बंदी शक्य आणि व्यावहारीक नाही ही बाब मान्य करुन दारुचे वाईट परिणाम कमी करने शक्य आहे का या दिशेने विचार करण्याची खरी गरज आहे. या अंगाने विचार करायचा झाला तर हार्ड लीकर ला पर्याय देण्याची आज खरी गरज असल्याचे मान्य करावे लागेल.धान्या पासून चे मद्य हा खरे तर उत्तम पर्याय आहे.पण विचारवंतांची मोहीम अविचाराने या पर्यायाचा गर्भपात करु पाहत आहेत.या मद्याला मान्यता दिली तर त्याच्या उत्पादनाला चालना मिळून किमती थोड्या कमी होतील.दुसरीकडे वाईट परिणाम होतात अशी अल्कोहलाचे प्रमाण अधिक असलेली स्वस्त दारु महाग करण्याची गरज आहे. पण दुर्दैवाने ही विचारवंत अल्कोहल आधिक्य असलेल्या स्वस्त व सहज उपलब्ध दारू बद्दल चकार शब्द ही न बोलुन चुकीचा संदेश देत आहेत. मद्या पासून दारु निर्मितीला विरोध करुन दारुच्या दुस्परिनामाला दुर करण्याची संधी या विचारवंताच्या दुराग्रहाने गमावली तर त्याची समाजाला भारी किम्मत मोजावी लागनार आहे.
वास्तविक दारू बंदिचा गडचिरोलि प्रयोग देशातील सर्वाधिक यशस्वी प्रयोग आहे.या प्रयोगाचे कर्तेही अभय आणि राणी बंग हे दाम्पत्यच आहे.कुपोशन दूर करण्याचा त्यांचा गडचिरोलि प्रयोग देश आणि दुनियात अमलात येवून शकतो तर दारु बंदिचा प्रयोग ही गडचिरोली बाहेर यशस्वी होवुन शकतो. आणि या प्रयोगात ही 100% दारू बंदी शक्य नाही हे एकदा जाहीर केले की दारू बंदी ची तर्क संगत मांडणी व वाटचाल सोपी होईल।
-सुधाकर जाधव
भ्रमण ध्वनि-9422168158

Friday, July 9, 2010

कापूस शेती व सूती वस्त्राला पर्यावरणीय आव्हान!

पर्यावरणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असला तरी तो प्रश्न सोडविन्या साठी सुरु असलेले प्रयत्न आणि धडपडणारे कार्यकर्ते यांच्या विषयी फारसे कौतुकाने लिहावे अशी परिस्थिती नाही.या विषयाला आंतरराष्ट्रीय महत्त्व असल्याने आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी कार्य करायला मुबलक पैसा उपलब्ध होत असल्याने आणि थोड्या कामासाठी मोठा पुरस्कार अल्पावधीत प्राप्त करून देणारे पर्यावरण हे एकमेव क्षेत्र असल्याने पैसा आणि पुरस्कार यावर डोळा असणारे भोंदू आणि ढोंगी यांचा या क्षेत्रात सुळसुलाट आहे.पर्यावरणाचे संतुलन राखन्यासाठी प्रामाणिकपणे काम करणारे बहुगुणा सारखे निर्मल कार्यकर्ते अपवादात्माकाच.पण जे निर्मल आहेत ते भाबड़ेहीआहेत! हे क्षेत्र व्यापले आहे ते आंतरराष्ट्रीय किर्ती प्राप्त करण्याच्या मोहात बदनाम झालेल्या डॉ.पचोरी आणि सुनीता नारायण सारख्यानी. यात भर पडली आहे ती पर्यावरणाच्या नावावर विकास कामाना सदैव विरोध करणार्या मेधा पाटकर आणि वन्दना शिवा सारख्यांची! म्हणुनच जगबुडीची हकाटी देणारे पर्यावरणवादी आणि जगाच्या अन्ताची तारीख़ घोषीत करणारे भविष्यवेत्ते यांच्यात फरक करने कठीन जाते. मात्र पर्यावरणाचा वैदयानिक कसोटीवर विचार करून उपाय सुचविनारे कार्यकर्ते याही क्षेत्रात आहेत.त्यापैकीच रेबेका अर्ली एक आहेत.व्यवसायाने फैशन डिजायनर असलेल्या रेबेकाने कापूस शेती बद्दल व सूती वस्त्रा बाबत घेतलेले आक्षेप विचार करण्या सारखे आहेत।
कापूस शेतीला उस वगळता अन्य पिकान्च्या तुलनेत पानी जास्त लागते। इतर सर्व पिकान्च्या तुलनेत खते आणि कीटक नाशके यांचा कापूस उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात वापर होतो.हे रेबेकाचे महत्वाचे आक्षेप आहेत.कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या यवतमाल जिल्ह्यात मी राहात असल्याने त्यांच्या आक्षेपात तथ्य आहे हे मी ठामपणे सांगू शकतो.कोरडवाहू शेतीत कापूस घेता येतो ,पण मग ओलिताच्या तुलनेत उत्पादन बरेच कमी होवून खर्च आणि उत्पन्न यांचा मेळ बसत नाही. खते आणि कीटक नाशकाच्या वापराच्या बाबतीत तर यवतमाल जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे। याचे शेत जमिनीवर आणि परिसरातील पर्यावरनावर नक्कीच दुस्परिणाम होत आहेत. कापूस शेतीचे डोळस विश्लेषण केल्या नंतर उपाय सुचविताना मात्र रेबेकाबाई अंधश्रद्धेकड़े झुकल्या आहेत। सेंद्रिय कापूस शेतीचा त्या पुरस्कार करीत आहेत.पण मग आजच्या तुलनेत उत्पादन खुप कमी होइल आणि ते कोणालाही परवडणार नाही.६० च्या दशका पर्यंत या देशातील शेती सेंद्रिय पद्धतीनेच होत होती.या शेतीत तुलनेने कर्ज बाजारीपणा कमी असला तरी दारिद्रयाचे प्रमाण आजच्या पेक्षा प्रचंड मोठे होते हे विसरून चालानार नाही.शिवाय वाढत्या जनसन्खेयला त्या शेतीतील उत्पादन पुरत नव्हते हे सत्य कसे नाकारता येइल?म्हणुनच घड्यालाची काटे उलटी फिरवून सेंद्रिय शेती कड़े परतन्या ऐवजी पानी ,खते आणि कीटकनाशके याचा अति वापर टालून कापूस शेती करायची असेल तर बी टी बियानांचा वापर हाच सर्वोत्तम पर्याय आहे.पर्यावरणविद रेबेका अर्ली यानी उपस्थीत केलेल्या प्रश्नाना बी टी बियाने हेच तर्क संगत उत्तर आहे ।
सूती वस्त्रा बाबत रेबेकाबाईनी उपस्थित केलेला मुद्दाही तितकाच मुलभुत आहे.सूती वस्त्र बनविताना पाण्याचा मुबलक वापर होतो .रंगांचा वापर अनेक पर्यावरणीय प्रश्न निर्माण करतात। शिवाय हे वस्त्र स्वच्छ करण्यासाठी जास्त पानी लागते.सूती वस्त्र लवकर जीर्ण होते आणि त्याचा पुनर्वापर करता येत नसल्याने त्याची विल्हेवाट लावणे ही समस्याच बनते.सूती वस्त्राच्या तुलनेत पोलिस्टर किंवा कृत्रीम धाग्या पासून बनाविलेली वस्त्र जास्त टिकाऊ असतात आणि त्याचा १०० टक्के पुनर्वापर शक्य असतो.त्यानी उपस्थीत केलेले मुद्दे चुकीचे आहे असे म्हणता येणार नाही.तरीही आपल्याकडे या संदर्भात तर्कसंगत विचार होने अवघड आहे.स्वातंत्र्य आन्दोलन पेटविण्यात कापूस महत्वाचा घटक राहिला आहे.ते आन्दोलन टिकविण्यात व पुढे नेण्यात खादी वस्त्राची अहम् भूमिका राहिली आहे। अगदी नजिकच्या काळात शेतकरी संघटनेने कापूस उत्पादक शेतकरी वर्गाला न्याय मिलवुन देण्यासाठी सूती वस्त्राचा जोरदार पुरस्कार करून ठीकठिकाणी कृत्रीम धाग्याच्या वस्त्राची होळी केली होती. पण आता या बाबीन्कडे इतिहास म्हणून बघण्याची वेळ आली आहे.अगदी अभिमानाने बघायला हरकत नाही.पण रेबेका बाईनी उपस्थित केलेले मुद्दे लक्षात घेता सूती वस्त्राचा आग्रह सोडून दिला पाहिजे.किमान ते टिकावे म्हणून अनुदान आणि इतर कुबड्या नकोत। सूती व पोली वस्त्रा सम्बद्धी रेबेका बाईनी शास्त्रीय तथ्य मांडले.पण मानवीय आधारावर विचार केला तरी एक बाब स्पष्ट आहे.कृत्रीम धाग्याच्या कपड्याने नग्न-अर्धनग्न अवस्थेत राहणारी बाया-माणसे आपले अंग झाकू शकले.महात्मा गांधी च्या काळात ही वस्त्र उपलब्ध असती तर कदाचित त्याना अर्धनग्न अवस्थेतील देश बांधवाना पाहून स्वत:च्या अंगावरील कपडे उतरविन्याची वेळ आली नसती!
मात्र यापुढे जावून अधिक मुलभुत विचार करण्याची गरज आहे.पर्यावरणाचा विचार करता सूती वस्त्र नको असतील तर कापूस उत्पादनाची गरजच काय? सरकी पासून मिळनार्या तेल व ढेपे साठी अन्य पर्याय उपलब्ध आहेतच.कापूस शेती अव्यवहार्य व अहितकारक ठरत असेल तर ती बंद करून ते क्षेत्र अन्य पिका साठी उपलब्ध करून देने केव्हाही श्रेयस्कर!माझ्या सारख्या खादी धारका साठी किंवा सूती वस्त्राच्या आग्रही मंडळी साठी रेबेका बाईची सेंद्रिय कापूस शेती पुरेशी ठरेल.कापूस शेतीचे पुढे काय होइल माहित नाही ,पण आपल्या परिवारातील सदस्य खादी वस्त्रा बाबत आग्रही नाहीत या बाबत आज पर्यंत वाटत असलेली खंत रेबेका बाईनी दूर केली याचा मला आनंद आहे!
सुधाकर जाधव
भ्रमण ध्वनि -9422168158