Friday, July 9, 2010

कापूस शेती व सूती वस्त्राला पर्यावरणीय आव्हान!

पर्यावरणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असला तरी तो प्रश्न सोडविन्या साठी सुरु असलेले प्रयत्न आणि धडपडणारे कार्यकर्ते यांच्या विषयी फारसे कौतुकाने लिहावे अशी परिस्थिती नाही.या विषयाला आंतरराष्ट्रीय महत्त्व असल्याने आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी कार्य करायला मुबलक पैसा उपलब्ध होत असल्याने आणि थोड्या कामासाठी मोठा पुरस्कार अल्पावधीत प्राप्त करून देणारे पर्यावरण हे एकमेव क्षेत्र असल्याने पैसा आणि पुरस्कार यावर डोळा असणारे भोंदू आणि ढोंगी यांचा या क्षेत्रात सुळसुलाट आहे.पर्यावरणाचे संतुलन राखन्यासाठी प्रामाणिकपणे काम करणारे बहुगुणा सारखे निर्मल कार्यकर्ते अपवादात्माकाच.पण जे निर्मल आहेत ते भाबड़ेहीआहेत! हे क्षेत्र व्यापले आहे ते आंतरराष्ट्रीय किर्ती प्राप्त करण्याच्या मोहात बदनाम झालेल्या डॉ.पचोरी आणि सुनीता नारायण सारख्यानी. यात भर पडली आहे ती पर्यावरणाच्या नावावर विकास कामाना सदैव विरोध करणार्या मेधा पाटकर आणि वन्दना शिवा सारख्यांची! म्हणुनच जगबुडीची हकाटी देणारे पर्यावरणवादी आणि जगाच्या अन्ताची तारीख़ घोषीत करणारे भविष्यवेत्ते यांच्यात फरक करने कठीन जाते. मात्र पर्यावरणाचा वैदयानिक कसोटीवर विचार करून उपाय सुचविनारे कार्यकर्ते याही क्षेत्रात आहेत.त्यापैकीच रेबेका अर्ली एक आहेत.व्यवसायाने फैशन डिजायनर असलेल्या रेबेकाने कापूस शेती बद्दल व सूती वस्त्रा बाबत घेतलेले आक्षेप विचार करण्या सारखे आहेत।
कापूस शेतीला उस वगळता अन्य पिकान्च्या तुलनेत पानी जास्त लागते। इतर सर्व पिकान्च्या तुलनेत खते आणि कीटक नाशके यांचा कापूस उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात वापर होतो.हे रेबेकाचे महत्वाचे आक्षेप आहेत.कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या यवतमाल जिल्ह्यात मी राहात असल्याने त्यांच्या आक्षेपात तथ्य आहे हे मी ठामपणे सांगू शकतो.कोरडवाहू शेतीत कापूस घेता येतो ,पण मग ओलिताच्या तुलनेत उत्पादन बरेच कमी होवून खर्च आणि उत्पन्न यांचा मेळ बसत नाही. खते आणि कीटक नाशकाच्या वापराच्या बाबतीत तर यवतमाल जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे। याचे शेत जमिनीवर आणि परिसरातील पर्यावरनावर नक्कीच दुस्परिणाम होत आहेत. कापूस शेतीचे डोळस विश्लेषण केल्या नंतर उपाय सुचविताना मात्र रेबेकाबाई अंधश्रद्धेकड़े झुकल्या आहेत। सेंद्रिय कापूस शेतीचा त्या पुरस्कार करीत आहेत.पण मग आजच्या तुलनेत उत्पादन खुप कमी होइल आणि ते कोणालाही परवडणार नाही.६० च्या दशका पर्यंत या देशातील शेती सेंद्रिय पद्धतीनेच होत होती.या शेतीत तुलनेने कर्ज बाजारीपणा कमी असला तरी दारिद्रयाचे प्रमाण आजच्या पेक्षा प्रचंड मोठे होते हे विसरून चालानार नाही.शिवाय वाढत्या जनसन्खेयला त्या शेतीतील उत्पादन पुरत नव्हते हे सत्य कसे नाकारता येइल?म्हणुनच घड्यालाची काटे उलटी फिरवून सेंद्रिय शेती कड़े परतन्या ऐवजी पानी ,खते आणि कीटकनाशके याचा अति वापर टालून कापूस शेती करायची असेल तर बी टी बियानांचा वापर हाच सर्वोत्तम पर्याय आहे.पर्यावरणविद रेबेका अर्ली यानी उपस्थीत केलेल्या प्रश्नाना बी टी बियाने हेच तर्क संगत उत्तर आहे ।
सूती वस्त्रा बाबत रेबेकाबाईनी उपस्थित केलेला मुद्दाही तितकाच मुलभुत आहे.सूती वस्त्र बनविताना पाण्याचा मुबलक वापर होतो .रंगांचा वापर अनेक पर्यावरणीय प्रश्न निर्माण करतात। शिवाय हे वस्त्र स्वच्छ करण्यासाठी जास्त पानी लागते.सूती वस्त्र लवकर जीर्ण होते आणि त्याचा पुनर्वापर करता येत नसल्याने त्याची विल्हेवाट लावणे ही समस्याच बनते.सूती वस्त्राच्या तुलनेत पोलिस्टर किंवा कृत्रीम धाग्या पासून बनाविलेली वस्त्र जास्त टिकाऊ असतात आणि त्याचा १०० टक्के पुनर्वापर शक्य असतो.त्यानी उपस्थीत केलेले मुद्दे चुकीचे आहे असे म्हणता येणार नाही.तरीही आपल्याकडे या संदर्भात तर्कसंगत विचार होने अवघड आहे.स्वातंत्र्य आन्दोलन पेटविण्यात कापूस महत्वाचा घटक राहिला आहे.ते आन्दोलन टिकविण्यात व पुढे नेण्यात खादी वस्त्राची अहम् भूमिका राहिली आहे। अगदी नजिकच्या काळात शेतकरी संघटनेने कापूस उत्पादक शेतकरी वर्गाला न्याय मिलवुन देण्यासाठी सूती वस्त्राचा जोरदार पुरस्कार करून ठीकठिकाणी कृत्रीम धाग्याच्या वस्त्राची होळी केली होती. पण आता या बाबीन्कडे इतिहास म्हणून बघण्याची वेळ आली आहे.अगदी अभिमानाने बघायला हरकत नाही.पण रेबेका बाईनी उपस्थित केलेले मुद्दे लक्षात घेता सूती वस्त्राचा आग्रह सोडून दिला पाहिजे.किमान ते टिकावे म्हणून अनुदान आणि इतर कुबड्या नकोत। सूती व पोली वस्त्रा सम्बद्धी रेबेका बाईनी शास्त्रीय तथ्य मांडले.पण मानवीय आधारावर विचार केला तरी एक बाब स्पष्ट आहे.कृत्रीम धाग्याच्या कपड्याने नग्न-अर्धनग्न अवस्थेत राहणारी बाया-माणसे आपले अंग झाकू शकले.महात्मा गांधी च्या काळात ही वस्त्र उपलब्ध असती तर कदाचित त्याना अर्धनग्न अवस्थेतील देश बांधवाना पाहून स्वत:च्या अंगावरील कपडे उतरविन्याची वेळ आली नसती!
मात्र यापुढे जावून अधिक मुलभुत विचार करण्याची गरज आहे.पर्यावरणाचा विचार करता सूती वस्त्र नको असतील तर कापूस उत्पादनाची गरजच काय? सरकी पासून मिळनार्या तेल व ढेपे साठी अन्य पर्याय उपलब्ध आहेतच.कापूस शेती अव्यवहार्य व अहितकारक ठरत असेल तर ती बंद करून ते क्षेत्र अन्य पिका साठी उपलब्ध करून देने केव्हाही श्रेयस्कर!माझ्या सारख्या खादी धारका साठी किंवा सूती वस्त्राच्या आग्रही मंडळी साठी रेबेका बाईची सेंद्रिय कापूस शेती पुरेशी ठरेल.कापूस शेतीचे पुढे काय होइल माहित नाही ,पण आपल्या परिवारातील सदस्य खादी वस्त्रा बाबत आग्रही नाहीत या बाबत आज पर्यंत वाटत असलेली खंत रेबेका बाईनी दूर केली याचा मला आनंद आहे!
सुधाकर जाधव
भ्रमण ध्वनि -9422168158

5 comments:

  1. Cotton fabric is one of the best that human beings could use. With BT the amount of insecticide to be used is going down. If one cares foe environment, one should focus on reducing use of water and insecticides.
    Please remember that nylon, terylene or polyester are non bio degradable. They are more dangerous. Remember they are produced from by products obtained during refining of crude.
    And if you do not want farmers to produce cotton, what shall they grow to keep themselves alive?
    Regards

    ReplyDelete
  2. Cotton is undoubtably the best fabric to use. Medically also it is suitable for the topical countries like India.

    Such articles are not only misleading but unnecessarily create the controversy and confusion amongst non thinkers / less educated.

    Rajendra Kulkarni

    ReplyDelete
  3. That was a thought provoking article. The only issue is whether the synthetic fabric is really recyclable.

    ReplyDelete
  4. तुमचा शेवटचा परिच्छेद उपरोधाने लिहिला आहे हे नीट स्पष्ट होत नाही त्यामुळे काहींना हा लेख मिसलीडींग वाटला आहे. उपरोध, उपहास नेहमी स्पष्ट असावा. तुम्ही विषय चांगला मांडला आहे.

    ReplyDelete