Sunday, July 25, 2010

हंगामा है क्यों बरपा.......!

माझ्या तरुणपनी "हंगामा है क्यों बरपा थोडीसी जो पी ली है ..."या गुलाम अलीने गायलेल्या गझलेने मला व माझ्या मित्राना अक्षरश: वेड लावले होते आणि तेहि आम्ही दारू बन्दीचे समर्थक असताना! आज ही गझल पुन्हा एकदा आठवन्याचे कारण आहे धान्यापासून मद्य निर्मितीवर सुरु असलेला हंगामा . दारू ढोसनारेच नशेत तर्काला सोडून बोलतात ही आपली पारम्पारिक समजूत.पण दारू न पिणारे सुद्धा नशेत असल्या सारखे बोलू शकतात यावर शिक्कामोर्तब करणारा हां वाद आहे.धान्या पासून मद्य निर्मितीचा किल्ला लढ़विनारे माझे मित्र अजित नरदे दारू पीत नाहीत आणि मद्य निर्मितीचा किल्ला ध्वस्त करायला निघालेले माननीय ठाकुरदासजी बंग , न्या.धर्माधिकारी,अन्नासाहेब हजारे ,नरेंद्र दाभोलकर , अनिल अवचट आणि या लढाई चे सेनापती असलेले डॉ.अभय बंग या सर्व सन्माननीय महानुभवाना तर दारू हां शब्द ओठातून उच्चारने देखील वेदनादायी ठरत असेल. स्पर्श तर फार दूरची बाब आहे! तरीही मद्य निर्मितीच्या प्रश्नावर ज्या अभिनिवेशाने तर्काला सोडून हे महानुभव बोलत आहेत ते बघून एखाद्या मद्यपीच्या बोलण्याची आठवण झाल्या शिवाय राहात नाही.कारण दोन्ही कडच्या मांडनी मधे भरपूर असंबद्धता आहे.
श्री अजित नरदे यानी धान्या पासून दारू निर्मिती करणे दारिद्र्यात असलेल्या ज्वारी व बाजरी उत्पादकान्साठी कसे फायदेशीर ठरू शकते याचे अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे.पण त्यांचा स्वत:चाच आपल्या अभ्यासपूर्ण प्रतिपादनावर विश्वास नसावा किंवा धान्या पासून मद्यनिर्मितीला विरोध करणारे पुरते नामोहरम व्हावेत यासाठी त्यांच्या वस्त्रहरनाचा प्रयत्न केला.डॉ.अभय बंग यांच्या बाल म्रत्यु रोखण्याच्या प्रयत्न व प्रयोगा पासून ते दाभोलकरांच्या अंध श्रद्धा निर्मुलनाचे कार्य व साने गुरुजींचे साधना साप्ताहिक चालविन्याचा प्रयत्न यावर अजित नरदे कारण नसताना घसरले. तसे पाहायला गेले तर कोणत्याही विषयाची आकडेवारी कधीच विश्वनीय नसते.मुद्दा सिद्ध करण्याच्या नादात हवा तसा आकड्यांचा खेळ करता येतो हे श्री नरदे ज्यांचा आधार घेतात त्या डॉ.श्याम अस्टेकराना देखील माहीत आहे.अगदी श्री नरदे जे आकडे पुढे करतात त्याला छेद देणारे आकड़ेही पुढे केले जावू शकतात.पण आकड्यांच्या अशा खेलाने श्री नरदे यांचे प्रतिपादन चुकीचे ठरत नाही व डॉ.बंग दाम्पत्यानी केलेल्या ऐतिहासिक प्रयत्नाचे मोल कमी होत नाही.मद्य निर्मितिला विरोध कैला म्हणून समाजातील अंधश्रद्धा निर्मुलनाचा दाभोलकराचा प्रयत्न कवडीमोल ठरत नाही हे नरदे यानी ध्यानी घ्यायला हवे होते. सर्वश्री ठाकुरदास बंग,न्या.चंद्रशेखर धर्माधिकारी आणि अन्ना हजारे यांचे सामाजासाठीचे योगदान मोलाचे आहे.त्याना दाम्भिक म्हनने हे त्यानी केलेल्या योगदानाची अवहेलना करण्या सारखे आहे. दारू मुक्त समाजाचे स्वप्न पाहने हा दाम्भिकपना होत नाही. याला स्वप्नरंजन म्हणता येइल.तसे ते स्वप्नरंजन आहे हे नरदे यानी दाखवूनही दिले आहे.समजा असा दारू मुक्त समाज निर्माण झाला तर नरदे याना नक्कीच आनन्द होइल. आपला समाज ज्या देव-देवतांची पूजा करतो त्या देवताना दारू प्रिय असली तरी आपल्या समाजात दारूला कधीच प्रतिष्ठा नव्हती.कथीत उच्चभ्रू समाजाचा अपवाद वगलता दारूला सामाजिक पेय म्हणून आजही मान्यता नाही.असे असुनही आम्ही दारु मुक्त समाजापासुन अनंत मैल दूर आहोत.दारू बंदी उद्दिष्ट आणि त्या दिशेने वाटचाल या बाबतीत सरकारने आपली विश्वासार्हता कधीच गमावली आहे .दारू उत्पादन व विक्री प्रक्रियेचे प्रत्यक्ष लाभ हे सरकारात सामील लोकांना मिळत असल्याने आणि एवढेच नाही तर दारुच्या व्यक्ती वा समाजावरिल विपरीत परिनामाचे लाभार्थी सुद्धा हीच मंडळी असल्याने दारू बंदीच्या दिशेने पाऊले उचलन्यास सरकार अनुत्सुक व अप्रामानिक असणार हे उघड आहे.त्यामुळे सरकारने विश्वासार्हता गमावलि यात आश्चर्य वाटन्या सारखे काहीच नाही.नवल आहे ते दारू बंदी बाबतीत सामाजिक संघटना व सामाजिक कार्यकर्ते यांची विश्वासार्हता कमी कमी होत चालल्याची.दारू बंदीच्या ध्येया प्रति प्रामाणिक असुनही हे घडते आहे कारण त्यांच्या चुकीच्या कल्पना व चुकीच्या माहिती आधारीत अशास्त्रिय व अतर्कसंगत प्रयत्न! याचा सर्वात मोठा आणि महत्वाचा पुरावा म्हणजे उपरोल्लेखीत महाराष्ट्रातील थोर समाजसेवकानी धान्यापासुन मद्य निर्मितीला विरोध करन्या साठी उघडलेली मोहीम ! यासम्बन्द्धी डॉक्टर अभय बंग यानी जाहीर केलेली भूमिका आणि या सर्व समाजसेवकानी या संदर्भात मुख्यमंत्री महोदयाला लिहिलेले पत्र प्रमाण मानून मी हे विवेचन करीत आहे.
या महानुभवांचे निवेदन गोंधलातच टाकणारे नव्हे तर चक्रावुन टाकणारे आहे.जोडीला भितीचा मोठा बागुल्बुवा उभा केला आहे.स्वत:च्या प्रतिपादनाच्या विरोधात जाणारे तर्क कौशल्याने वापरून सामन्यांच्या समज शक्तीलाच आव्हान दिले आहे.हे आव्हान स्विकारन्या ऐवजी सामान्य माणूस अचम्बित होवून विचार करन्याचे सोडुन विभूती सम व्यक्ती सांगताहेत तर खरेच असले पाहिजे असे मानून हात वर करणार यात शंकाच नाही.धान्या पासून मद्य निर्मितीतुन अन्न सुरक्षेला मोठा धोका निर्माण होणार ही अनेक चिंता पैकी सर्वात महत्वाचि चिंता या महानुभवाना वाटत असल्याचे त्यांच्या निवेदना वरून दिसते.अन्न सुरक्षा हा नक्कीच महत्वाचा प्रश्न आहे.धान्या पासून मद्य निर्मिती केल्याने अन्न सुरक्षा धोक्यात येणार असेल तर आधीच सावध केल्या बद्दल या महानुभवान्चे नक्कीच कौतुक करावे लागेल.पण खरी परिस्थिती काय आहे? ? ज्वारी आणि बाजरी या धान्या पासून मद्य निर्मितीची योजना आहे.या पिकाना बाजारात माती मोल भाव आहे.या धान्याचे उत्पादक नेहमीच दारिद्र्यात रहात आले आहेत.शिवाय या धान्याला जे पिकवितात त्यांच्या पलीकडे खान्या साठी मागणी नाही.उत्पादक शेतकरी आनंदाने नाही तर मजबुरीने ज्वारि-बाजरीची भाकर खातो.त्याच्याच शेतावर काम करणारा मजुर सुद्धा ज्वारी-बाजरी खात नाही.म्हणून खान्या साठी या धान्याचा उपयोग नाही.निवेदनात सरकारने हे धान्य विकत घेवून राशन दुकानातून विकावे असा सल्ला आहे.पूर्वी रशन दुकानात ज्वारी असायची आणि दारिद्र्य रेशे खालील व्यक्ती सुद्धा ती उचलायला तयार नसल्याने गोदामात खराब होवून सरकारला मोथे नुकसान सहन करावे लागायचे हा फार जुना इतिहास नसतानाही निवेदन कर्त्याला त्याचा विसर पडलेला दिसतो . ज्या पिकाना खाण्यासाठी मागनीच नाही त्यांचा अन्न सुरक्शे साठी काय उपयोग? तसेही या पिकांचे क्शेत्र फार मर्यादित आहे.1% पेक्षाही कमी कृषी योग्य जमिनीत हे पीक घेतले जाते.अन्न सुरक्शे साठी ही बाब अगदीच नगन्य आहे. खान्या साठी मागणी नसलेले व बाजारात मोल नसलेले हे धान्य मद्य निर्मिती साठी वापरल्याने धान्य उत्पादक शेतकरी दारिद्र्यातुन बाहेर पडू शकतो. या विचारवंतानी अन्न सुरक्षा व दारू निर्मिती याची सांगड घालून गल्लत केली हे उघड आहे.अन्न सुरक्षा धोक्यात येनार आहे ती धान्यापासुन मद्य निर्मितीतुन नव्हे तर जनुकिय बियानांच्या बाबतीत कथित पर्यावरणवादी व गांधी वादी विचारवंताच्या चुकीच्या भूमिकेने.विषम व चंचल हवामानाचा मुकाबला करण्याची व प्रचंड लोकसंखेची धान्याची गरज भागविन्याची क्षमता फक्त जनुकिय बियानात आहे हे सत्य स्वत:ला "सत्याचा शोध घेनारे" समजनारे समजतील तेव्हा अन्न सुरक्शाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा दूर होईल.

धान्या पासून मद्य निर्मितीला विरोध करताना या विभुतीनी आणखी एक महत्वाचे कारण पुढे केले आहे.त्यांच्या मते यामुळे दारूचा महापूर येवून अक्खा समज व्यसनाधीन होईल.मद्य निर्मिती विरोधी मोहिमेचे सेनापती म्हणून मी ज्यांचा उल्लेख केला त्या अभय बंग यानी जी आकदे मोड केली आहे त्या आधारेच ही भीती निराधार व निरर्थक असल्याचे सिद्ध होते. धान्या पासून मद्य निर्मितीला विरोध करताना या विभुतीनी आणखी एक महत्वाचे कारण पुढे केले आहे.त्यांच्या मते यामुळे दारूचा महापूर येवून अक्खा समज व्यसनाधीन होईल.मद्य निर्मिती विरोधी मोहिमेचे सेनापती म्हणून मी ज्यांचा उल्लेख केला त्या अभय बंग यानी जी आकदे मोड केली आहे त्या आधारेच ही भीती निराधार व निरर्थक असल्याचे सिद्ध होते. त्यांनी केलेल्या गनिता प्रमाणे धान्या पासून मद्य निर्मितीचा खर्च 200 रुपये प्रति लिटर च्या पुढे येतो.सरकारची 10 रुपयाची सबसिदी गृहित धरली तरी हे मद्य बाजारात किमान 250 रुपये प्रति लिटर भावाने विकले जाईल हे सुद्धा डॉक्टर बंग यांना मान्य आहे.सर्व सामान्यांच्या अवाक्या बाहेरच हे मद्य असणार हे उघड आहे. शेतकरी एवढी महाग दारू पितील असे म्हणणे म्हणजे शेतकरी वर्गाच्या दारिद्र्याची क्रूर चेस्ता करन्या सारखे आहे.ज्या दिवशी ज्वारी-बाजरी पिकविनारा दरिद्री शेतकरी ही दारू पिण्याच्या स्थितीत येईल त्या दिवशी त्यांच्याच नव्हे तर देशातील दारिद्र्याचा अंत झालेला असेल! याचा ग्राहक पंच तारांकित असणार हे नक्की.दारु पिन्याने गौर गरिबांचे जीवनच उद्ध्वस्त होते.पंच तारांकिताना गरीबी कोनत्याच कारणाने शिवत नसल्याने त्यांच्या पिन्यावर कोनाचाच आक्शेप नसतो.परकीय चलन खर्च करुन दारू पिनारे हे महाभाग या देशी पर्याया कडे आकर्षित झाले तर परकीय चलन वाचून अर्थ व्यवस्थेचा फायदाच होईल. या दारूचा महापूर सोडा ही दारू सामान्य दारु प्रेमिना बघायला मिळाली तरी ते खूष होतील!महत्वाची बाब म्हणजे ज्यांना प्यायची आहे त्यांच्या साठी आज दारू सहज उपलब्ध आहे.त्या अर्थाने दारूचा महापूर आज आहेच.पण म्हणून सगळा समाज व्यसनी बनून गुन्हेगार झालेला नाही. दारुचे दुस्परिनाम नक्कीच आहेत.पण समाजातील सर्व दु:खाना ,समस्याना दारू कारणीभूत आहे असे मानने अतिरंजीतच नव्हे तर हास्यास्पद आहे.
दारूच्या नशेत कायदेशीर व जबाबदार व्यवहार करता येत नाही असा एक मुद्दा या निवेदनात आहे.कदाचित हे म्हणणे बरोबरही असेल.पण यातून ध्वनीत होणारा दुसरा अर्थ -दारू न पिनारे कायदेशीर व जबाबदार व्यवहार करतात -साफ चुकीचा आहे. गुजरात राज्यात प्रदिर्घ काळा पासून दारू बंदी आहे.तरीही त्याच राज्यात स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वाधिक बेजबाबदार आणि बेकायदेशीर आणि घ्रुनास्पद गुन्हेगारी वर्तन अक्ख्या जगाने बघितले आहे. या वर्तनाने पीडीत असहाय माणसे आसरा शोधण्यासाठी महात्मा गांधींनी स्थापन केलेल्या साबरमती आश्रमा जवळ आले तर त्याना आत न घेता आश्रमाची दारे बंद करणारे दारू बंदीचा उदो उदो करनारेच होते.तेव्हा कायदेशीर व जबाबदार वर्तन याचा दारू पीने वा न पीने याच्याशी फारसा सम्बध नसतो हे उघड आहे.

दारू पीन्याने उत्पादकता कमी होते असाही दावा रशियाचा दाखला देवून या निवेदनातुन करण्यात आला आहे.रशियात साम्यवादी राजवट होती तेव्हाही जवळ जवळ संपूर्ण रशिया व्होदका पिनारा होता व आज ही तो दारुच्या बाबतीत तसाच आहे.साम्यवादा कडून उदारवादा कडे संक्रमन होण्याच्या काळात स्वातंत्र्याचा पहिल्यांदा उपभोग घेण्याची संधी प्राप्त झाल्याने काही काळ तेथील उत्पादन घसरले होते हे खरे.पण आता तेथील उत्पादनही वाढते आहे आणि दारूचा खपही!रशियात दारुच्या आयातीत व्रुद्धी झाल्याचे जग जाहीर आहे.यूरोप-अमेरिका दारू सेवना सोबत उत्पादकतेत सुद्धा आघाडीवर आहेत.त्यांची उत्पादकता जेथे अजिबात दारूची उप्लब्धता नाही अशा मुस्लिम देशा पेक्षा किती तरी अधिक आहे. चुकीचे दाखले देवून आपल्या देशात दारुबंदी साठी अनुकुलता निर्माण होईल अशी या महानुभवांची चुकीची समजूत झालेली दिसते.
दारु पिन्याला मी माणसाच्या स्वातंत्र्याशी अजिबात जोडत नाही .आपल्या देशातील अनुभव असा आहे की दारूने संपूर्ण कुटुंबच देशोधदीला लागते.दारु पिण्याचे स्वातंत्र्य घेणारा कुटुंबातील अन्य सदस्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालत असतो-विशेषत: स्त्री सदस्याच्या!म्हणूनच स्वातंत्र्याच्या नावावर शेतकरी संघतनेचे नेते दारुचे समर्थन करीत असले तरी शेतकरी महिला सदैव दारु बंदीला अनुकूल दिसतील.मात्र सध्या दारु बंदी शक्य आणि व्यावहारीक नाही ही बाब मान्य करुन दारुचे वाईट परिणाम कमी करने शक्य आहे का या दिशेने विचार करण्याची खरी गरज आहे. या अंगाने विचार करायचा झाला तर हार्ड लीकर ला पर्याय देण्याची आज खरी गरज असल्याचे मान्य करावे लागेल.धान्या पासून चे मद्य हा खरे तर उत्तम पर्याय आहे.पण विचारवंतांची मोहीम अविचाराने या पर्यायाचा गर्भपात करु पाहत आहेत.या मद्याला मान्यता दिली तर त्याच्या उत्पादनाला चालना मिळून किमती थोड्या कमी होतील.दुसरीकडे वाईट परिणाम होतात अशी अल्कोहलाचे प्रमाण अधिक असलेली स्वस्त दारु महाग करण्याची गरज आहे. पण दुर्दैवाने ही विचारवंत अल्कोहल आधिक्य असलेल्या स्वस्त व सहज उपलब्ध दारू बद्दल चकार शब्द ही न बोलुन चुकीचा संदेश देत आहेत. मद्या पासून दारु निर्मितीला विरोध करुन दारुच्या दुस्परिनामाला दुर करण्याची संधी या विचारवंताच्या दुराग्रहाने गमावली तर त्याची समाजाला भारी किम्मत मोजावी लागनार आहे.
वास्तविक दारू बंदिचा गडचिरोलि प्रयोग देशातील सर्वाधिक यशस्वी प्रयोग आहे.या प्रयोगाचे कर्तेही अभय आणि राणी बंग हे दाम्पत्यच आहे.कुपोशन दूर करण्याचा त्यांचा गडचिरोलि प्रयोग देश आणि दुनियात अमलात येवून शकतो तर दारु बंदिचा प्रयोग ही गडचिरोली बाहेर यशस्वी होवुन शकतो. आणि या प्रयोगात ही 100% दारू बंदी शक्य नाही हे एकदा जाहीर केले की दारू बंदी ची तर्क संगत मांडणी व वाटचाल सोपी होईल।
-सुधाकर जाधव
भ्रमण ध्वनि-9422168158

8 comments:

  1. आपण पूर्णपणे तर्कसंगत विचार करून लिहिता याबद्दल कौतुक वाटते.आपल्या संदर्भासाठी एक मुद्दा सुचवते. वाग्भटाचार्यांचा ग्रंत मिळवून त्यातील मद्याविषयीचा भाग कधीतरी अवश्य वाचा. आयुर्वेदात मद्य हे अन्नापासून, धान्यापासून बनवलेले असले आणि ते योग्य प्रमाणात सेवन केले तर ते श्रेयस्कर आहे असा स्पष्ट उल्लेख आहे. वाट्टेल त्या गोष्टींची कुसवणे घालून गाळलेले मद्य केवळ दुःख विसरण्यासाठी, आयुष्याची परवड विसरण्यासाठी गरीब लोक पितात, त्याने त्यांचा दुहेरी तोटा होतो.

    ReplyDelete
  2. Mudde Raast aanee Bintod aahet.
    Jwari aanee baajree AnnDhaanya Naslayaamule Prastaavit daaru vishayee 'AnnaDhannyaa Paasun Tayaar Honaari Daaru' ase na Mhantaa Keval DHANNYAA Pasun Tayaar Honaaree Mhatle paahije.
    Yaa Lekhaat Ek Muddaa Raahun Gelaay. Sarkaarne DARU utpaadanaache Licene Va TyaaVar Anudaan Dyaave kaa? Yaa Vishayee Lekhaat BHASHY Yaaylaa Have hote. Abhay Bang Va Nardechyaa Naadaat te raahun gele ase Vaatate.
    Ekandarit Lekh Uttam aahe. Karan Sadetol aahe. Tark Sangat aahe. Santulit aanee Sayami aahe.

    ReplyDelete
  3. Shri Jadhav is well known for LOGIC! He has put up an impeccable case to ponder over.

    Wine production has also been a great business in Africa, Cape Wines are famous. It is also knwon that wine (in limited quantities) is good for health. Many of Ayurvedic medicines contain an in-situ produced alcohol.

    Alcohol-free society is possible through proper education of the wealthy youngsters, who are the major consumers of drinks today. May be future will be bright!

    ReplyDelete
  4. comments by rajeev basargekar:

    Read your article, it is nice.

    I do not want to go in morality of alcohol consumption. Opinions will vary, geographical and climatic compulsions will make the case different in different situations. That is case will be different for adivasis living in Satpuda region who eat bhakaris made from Mahua flowers and also drink liquor made from them.

    I do not know what is the present consumption level of Jawar and Bajra, vis-à-vis production of these.
    In some areas of the country, at one time, climatically agriculture of only Jawar / Bajra was possible, and production was in excess to consumption. This was leading to lower prices. Prices of White Jawar are good - (not remunerative if all aspects of costing such as depreciation / replineshment of land fertility costs are considered, but probably as remunerative as wheat). Price of hybrid Jawar are low, production climatically compulsory in some parts, and nobody wants to eat bhakri prepared form hybrid jawar, unless compulsory. (probably goes more as animal feed and bhakris for prisoners in jail)

    I do not know if presently hybrid jawar is produced in excess of demand. Any sustainable industry requires sustainable supply of raw material. If Jawar ? Bajra is in excess and is available as industrial raw material then only any industry is possible. We know from observing Madhavrao Khanderao More’s effort of making wine / champagne from grapes that when precooling technology came, exporting of grapes fetched more money, winery had to be stopped. (Now also, I think, it is running as contract for somebody, when variety of grapes not good for eating directly and having lower production cost have become available for making wine)

    Moreover industry (and India) survies and prospers with raw material at minimum price and finished goods at maximum price. Those who will be putting money will calculate all that and also take into account excise duty by government. By today’s scenario liquor made from molasses (Kakvi) from sugar industry (contains carbon added for making sugar white and still contains 45 % non-crystallizable sugar which can be fermented to alcohol) will always be a cheaper raw material for making liquor.

    Those (including our friend Ajit Narade) who think that farmers will get benefitted from making liquor from Jawa/Bajra should declsre at what price they want to buy. One can talk with Hemant Borawake, who has planted grapes for wines, about situation of payment to grape growers by wine makers.

    Point is before thinking of morality of drinking,
    1. One should check whether the food grain proposed to be used for making liquor is presently used for eating
    2. Whether farmers are likely to get anything out of it.

    Anyway discussion should go on. (Charcha Jhali pahije !!)

    Dr. Rajeev Basargekar
    Reliance Technology Group - Polymers
    RIL, Chembur, Mumbai 400 071
    Ph (D) 022 67677337
    Ph (M) 9322596646

    ReplyDelete
  5. The one relevant point the Bung gang makes is that the project should not be subsidised by the State. The Narde side is essentially opposing State intervention for a supposedly desirable social reform that has been seen to be contrary to Farm interests. There can be no argument against using millets as brew stock if the brewers get venture capital rather than subsidies which are all, per se, pernicious.
    - Sharad Joshi

    ReplyDelete
  6. शरद जोशी म्हणतात:
    बंग समूह, राज्याने या प्रकल्पाला अनुदान देऊ नये, हा एक प्रासंगिक मुद्दा मांडतोय. नरडे प्रभृतींचा राज्याच्या हस्तक्षेपाला असलेला विरोध हा मूलतः तथाकथित आवश्यक सामाजिक सुधारणांसाठी आहे, ज्यांच्या कडे शेती हिताच्या विरोधाभासात बघितले जातेय. दारू उत्पादकाला अनुदाना ऐवजी, जे एकूणच हानिकारक आहे, मुल भांडवल मिळणार असेल तर ज्वारी चा उपयोग दारू बनविण्यासाठी म्हणून करण्याविरुद्ध कोणताही तर्क असू शकत नाही.

    ReplyDelete
  7. dear shri SUDHAKAR JADHAV,as a doctor i would definately discourage alcohol at addiction level but studies says that alcohol in minimal quantity of 30ml./day is good for heart anyway but the main point of discussion n dispute is about its production from EDIBLE grains.as u have rightly said JWAR N BAJRA are sparingly cultivated n eaten by vidarbhian farmers the only CASH crop is COTTON(WHITE GOLD)so it is theoratically justified to produce it from NON EDIBLE GRAINS but NOT to consume ALCOHOL for health sake

    ReplyDelete
  8. Alcohols (ethyl and methyl) are most used industrial solvents and are also being used as fuel. The article keeps on talking about DARU, which is likely to be a very small component of ethyl alcohol production once its use as petrol substitute takes off. Producing alcohols from cellulosic and non cellulosic, lignin containing agricultural and industrial feeds will be common. ultimately as Rajeev Basargekar has pointed out,"...industry (and India) survies and prospers with raw material at minimum price and finished goods at maximum price."

    ReplyDelete