Saturday, May 15, 2010

तेव्हा कुठे गेला होता संघ सुता तुझा धर्म ?

बनावट चकमक घडवून एका आरोपीस ठार मारल्याच्या आरोपावरून सी बी आय ने गुजरात राज्यातील काही पोलीस अधिकारयान्ना अटक केली.न्यायालयाच्या आदेशा वरुन सी बी आय ने या प्रकरणी चौकशी करून कारवाई केली.कायद्यानुसार झालेली न्याय संगत कारवाई त्या राज्यात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाला अजिबात रुचली नाही.आपली सर्व शक्ती आणि प्रतिष्टा पणाला लावून त्या पक्षाने सी बी आय च्या कारवाईला विरोध चालविला आहे.अन्य पक्षाच्या ज्या नेत्यांनी सी बी आय कारवाईचे समर्थन केले त्या नेत्यांची "कुत्रे" अशी संभावना पक्षाचे संघ संस्कारी राश्ट्रीय अध्यक्ष नितिन गडकरी यांनी केली आहे.याचा अर्थ टोकाला जावून बी जे पी सीबीआय कारवाईचा विरोध करीत आहे.आपल्या १०० च्या वर खासदारांना घेवुन पक्षाचे सर्व वरिष्ट नेते अपराधी पोलिसांचा बचाव करण्या साठी महामहीम राष्ट्रपतीना साकडे घालून आले ही घटना अभूतपूर्व आहे! न्यायालायावर टिका करने शक्य नसल्याने केंद्र सरकार सी बी आय ला हाताशी धरून गुजरात पोलिसांचे मनोधैर्य खच्ची करीत असल्याचा कांगावा बी जे पी करीत आहे. या म्हनन्यात तथ्य आहे असे ग्रहीत धरले तरी बी जे पी ला बोलण्याचा कोणता नैतिक अधिकार आहे? बी जे पी शासित राज्यात सरकारी यंत्रनेचे हात बांधून किंवा ती यंत्रणा हाताशी धरून संघ परिवारातील विविध घटक आपला हिंदुत्वाचा छुपा अजेंडा राबविन्यासाठी उघड पणे घटनाबाह्य व बेकायदेशीर कारवाईत लिप्त असल्याचे देशाने व जगाने बघितले आहे।
उत्तर प्रदेशात सत्ता हाती असताना पोलिसाना बघ्याची भूमिका घ्यायला लावून संघ परिवाराने बाबरी मस्जीद जमीनदोस्त केली होती. ओरिसा राज्यात सयुक्त सरकारात असतांनाही संघ परिवाराने ख्रिस्ती समुदाया विरुद्ध केलेली हिंसा काय किंवा कर्नाटकात सत्ता हाती आल्या बरोबर श्रीराम सेनेने महिलांची केलेली विटम्बना काय, ही सगळी कृत्य सरकारी यंत्रणा हाताशी धरुनच करण्यात आली आहेत.आजही बी जे पी शासित मध्य प्रदेशात ख्रिस्ती समुदयावर संघ परिवाराचे हल्ले सुरु आहेत.केंद्रात बी जे पी ची सत्ता आल्यावर याच पक्षाचे राज्य असलेल्या गुजरात राज्यात माणुसकी व घटनेची चाड न बाळगता नरेन्द्र मोदीच्या नेतृत्वाखाली संघ परिवाराने जे केले त्याची तुलना त्यांच्याच आधीच्या बेकायदेशीर कृत्याशी होवू शकत नाही एवढ्या मर्यादा त्यानी ओलंडल्या .केन्द्रात सरकार असल्याचा फ़ायदा घेवुन संघ परिवाराने मुस्लिम समुदयावर अत्याचार करण्यासाठी संपूर्ण सरकारी यंत्रणा आपल्या कार्यकर्त्या सोबत कामाला लावली .पोलिस यंत्रणा तर अत्याचार करण्यात आघाडीवर होती!या देशात सरकारी यंत्रनेचा एवढ्या क्रूर वापर पहिल्यांदाच झाला आणि तो सुद्धा केंद्र सरकार सीबीआय चा गुजरातेत गैर वापर करीत असल्याची ओरड करनारया बी जे पी ने केला!
महामहिम राष्ट्रपतीजीना भेटून आल्यावर पत्रकारांशी बोलतांना लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्या श्रीमती सुषमा स्वराज यानी पोलिसांनी कुख्यात गुंडाला मारले असल्याने त्यांचे कौतुक करायचे सोडून सीबीआय करवी त्रास देत असल्याचा कांगावा केला.श्रीमती स्वराज सारख्या जेष्ठ नेत्याला कायद्याचे द्द्यान नाही असे नाही.पण कोणत्याही परिस्थीतीत दोषीपोलिसांना सजा होवू नये हां त्यांचा प्रयत्न आहे.कारण सजा झाली तर देशभर मोदी प्रयोग राबविन्याच्या बीजेपी व संघ परिवाराच्या मनासुब्यावर पानी फेरल्या जाण्याची त्यांना भीती आहे.कारण सरकार पाठीशी असतांनाही बेकायदेशीर कृती साठी शिक्षा होवू शकते हे पोलिस व इतर सरकारी यंत्रनेला दिसून आले तर मोदी प्रयोगात इतर राज्यातील पोलिस व अन्य सरकारी यंत्रणा सहभागी होणारच नाही! म्हणुनच एवढ्या अटीतटीवर येवून बीजेपी गुजरात मधील दोषी पोलिस अधिकारी वर्गाला वाचविन्याचा प्रयत्न करीत आहे।
याचा अर्थ सीबीआय चा दुरूपयोग होत नाही असा नाही.आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्याच्या भ्रष्टाचाराचा उपयोग त्याला शिक्षा देण्या ऐवजी सीबीआय करवी त्याला आपल्या दावणीला बान्धन्या साठी किंवा त्याला नामोहरण करण्यासाठी सीबीआय चा नेहमीच उपयोग करून घेण्यात आला आहे.बीजेपी ही यात मागे नाही. त्यांची सत्ता असलेल्या बिहार राज्यात लालू प्रसादाना नामोहरण करण्या साठी सीबीआय चा वापर तिथल्या राज्य सरकारने केला आहेच!म्हणुनच सीबीआय विरोधाची बीजेपी ची मोहिम म्हणजे चोराच्या उलट्या बोम्बा आहेत!"महाभारतात विचारलेल्या प्रश्नाच्या धर्तीवर बीजेपी ला "तेव्हा कुठे गेला होता संघ सुता तुझा धर्म ?" असा प्रश्न विचारला पाहिजे ! [समाप्त ]
१५ मे २०१० -सुधाकर जाधव

1 comment:

  1. Your article has put forth facts in their proper perspective. Dr Sanjeev Mangrulkar

    ReplyDelete