Wednesday, April 27, 2011

आंदोलनाच्या यशाचे रहस्य







"
"खर तर अन्नान्च्या आन्दोलन कालात 
जंतर मंतर वर येशु ख्रीस्त अवतरला असता आणि  भ्रष्टाचार कधीच केला नाही त्याने राज्यकर्त्या वर पहिला दगड मारावा असे सांगितले असते तर पूर्ण जंतर मंतर रिकामे झाले असते.तिथे उरले असते   फ़क्त आंदोलनाचा भावनिक प्रभाव वाढावा म्हणून नियोजनपूर्वक जमविलेले अबोध बालक!अन्नान्चा  सुद्धा अबोध बालकात समावेश होतो हे वेगले सांगायला नको!"








                          आंदोलनाच्या यशाचे रहस्य
                                            
                       सर्वसाधारणपने गोऱ्या  रंगाचे कौतुक आणि आकर्षण सार्वत्रिक आहे.हे कौतुक व् आकर्षण सकृतदर्शनी रंगा संदर्भात  व्यक्त होत असले तरी  गोरा रंग इतर रंगाच्या तुलनेत का चांगला याला कोणताच आधार देता येत 
नाही.इतर रंग गोऱ्या रंगाच्या तुलनेत  भेसूर आणि अनाकर्षक असते तर कोणालाच  इन्द्र्धनुस्याचे कौतुक  वाटले नसते!सगळे रंग मनोहारी असतात म्हणून तर इन्द्र्धनुस्य मनोहर,मन मोहक दिसते.तरीही आम्ही गोऱ्या रंगाला सरस 
असल्याची पावती देत असतो.ही जी सरसता आमच्या मनावर बिम्बली आहे खरे तर ती रंगाची नाही ,या रंगाच्या माणसाची आहे! या  रंगाच्या  माणसानी,  या रंगाच्या   समाजाने    आणि या रंगाच्या देशाने साऱ्या जगावर हुकूमत  गाजविली  आहे.कित्येक  शतके  साऱ्या  जगाची  त्यानी   
लुट  करुन  द्न्यान - विद्न्यान  , कला-संस्कृती , निर्मिती आणि  ऐशोआरामाची साधने  या सर्व बाबतीत
इतरापेक्षा म्हणजेच काळ्या  पेक्षा भरून काढता  येणार नाही  इतकी आघाडी   घेतली आहे. मध्ययुग असूदया नाही तर औद्योगिक युग किंवा अगदी अणुयुगातही  सर्वच क्षेत्रात आघाडीवर गोरेच दिसतात.
खंड कोणताही असला तरी आघाडीवर गोरेच.अगदी काळ्यान्च्या आफ्रिका खंडात सुद्धा गोरेच सुखी आणि समृद्ध आहेत. राजकीय व्यवस्था कोणतीही असली-लोकशाही किंवा हुकुमशाही-तरी गोऱ्यान्च्या आघाडीत फरक पडणार नाही.पुर्वीचा एकसंघ रशिया आणि अमेरिका ही दोन राष्ट्रे याचे उत्तम उदाहरण आहे.याच राष्ट्रांच्या उदाहरनावरुन आपल्या हे ही लक्षात येइल की आर्थिक व्यवस्था समाजवादी असली तरी प्रभुत्व गोऱ्यान्चे आणि अर्थव्यवस्था भांडवलशाहीची असली तरी प्रभुत्व गोऱ्यान्चेच ! गोरा रंग आम्हाला श्रेष्ठ वाटतो कारण गोरे लोक श्रेष्ठ होते आणि आहेत ही त्यामागची भावना आहे.

अगदी एका सार्वभौम राष्ट्रात सुद्धा काळ्या आणि गोऱ्या मधील फरक चटकन नजरेत भरेल.यासाठी अमेरिका किंवा आफ्रिकेचे उदाहरण मी देणार नाही.कारण गोरे आफ्रिकेत गेले ते राज्य करायला.या कारणाने ते श्रेष्ठ असणारच आहेत.काले अमेरिकेत आले ते गुलाम म्हणून.अर्थात त्यांचे स्थान खालचे असणारच.पण पूर्वीच्या एकसंघ असलेल्या खंडप्राय रशियाचा विस्तार आशिया आणि यूरोप खंडात होता.रशियाचा युरोपातील भाग गोऱ्यान्चा तर आशियातील भाग काळ्यान्चा .काळ्या पेक्षा गोऱ्यान्चा भाग अधिक संपन्न आणि समृद्ध असणार हे ओघाने आलेच.त्या काळच्या राज्यव्यवस्थेत तेथे वर्चस्व गोऱ्या न्चे होते.रशियाच्या विभाजनात काले व् गोरे अलग झाले.पण अलग होवुनही काळ्याना  गोऱ्यान्ची बरोबरी
साधता आली नाही.गोऱ्यान्चे शासन व् शोषण तंत्र आत्मसात न केल्याचा हां परिणाम असावा.

                                  काळ्या मधील काले आणि गोरे

आशिया खंड तसा काळ्यान्चा ,पण तेथेही लाल वर्णीय मंगोलियन अन्य काळ्या पेक्षा पुढेच दिसतात.पण आता रंगाचा हां महिमा इतिहास जमा होत आहे.तसा तो इतिहास जमा करण्यात
काळ्यान्चा वाटा सिंहाचा आहे.पण आपल्या अक्कल हुशारीने व् परिश्रमाने काळ्याने गोऱ्यावर मात केली अशी समजूत करून घेण्याचे  कारण नाही.यानी आपली अक्कल वापरली ती गोऱ्या न्चे शासन व् शोषण तंत्र आत्मसात करून काळ्यावरच सर्व क्षेत्रात हुकूमत गाजविन्यासाठी!आज पर्यंत गोऱ्यानी काळ्यावर हुकूमत गाजविन्याचा इतिहासात काळ्यानी काळ्यावर हुकूमत गाजविन्याचे नवे प्रकरण लिहिले आणि जोडले जाण्याचा हां काळ आहे.याची रंगात विभागणी करता येत नाही म्हनुन भारत-इंडिया असा भेद करून देशातील काळ्या-गोऱ्याचा फरक लक्षात आणून दिला जातो.भारत इंडिया तील फरक ही तंतोतंत काळ्या-गोऱ्यातील फरका सारखाच आहे.जगभरात गोऱ्यान्च्या वाट्याला 
आलेले ऐश्वर्य ,सुख,सम्पन्नता,विलासिता येथे इंडियाच्या  वाटेला , तर काळ्यान्च्या वाट्याला आलेले सर्व
प्रकारचे दू:ख ,अभाव ,दारिद्र्य आणि गुलामी येथे भारताच्या वाट्याला आली आहे.इतिहासात गोरे संपन्न होत गेले आणि काळ्यान्च्या पदरी कंगालता आली त्याच धर्तीवर आज इंडिया संपन्न तर भारत कंगाल होत आहे.ही सम्पन्नता आणि कंगालता केवळ जीवन मानातून दिसते असे नाही तर जीवनाच्या सर्वच क्षेत्रात तिचे प्रतिबिम्ब दिसते.अगदी भारत आणि इंडियाच्या देवातुन सुद्धा भेद स्पष्ट होतो.भारताचे देव तेलकट,मेनचट,ओबड-धोबड़ आणि कालेकुट्ट .इंडियाचे देवसुद्धा गोरे-गोमटे,सुबक आणि सजविलेले!भारताचे देवस्थान सुद्धा कंगाल,सरकारच्या भिकेवर तग धरून असलेले तर इंडियाच्या
देवस्थानात पैशा सोबत सोन्या चांदीचा महापुर,सरकारच्या झोलीत भीक ताकू शकणारी!ज्याना भारत-इंडिया भेद कळत नाही किंवा मान्य नाही त्यानी देव आणि देवस्थानातील फरक पाहिला तर आणखी
काही सांगण्याची गरजच पडणार  नाही.

                                    काळ्याना दुय्यम स्थान - आन्दोलनही उपेक्षित

काळ्यान्च्या मतावर म्हणजे भारताच्या मतावर निवडून आलेले सरकार सुद्धा नेहमीच काळ्याना डावलून इंडियाला झुकते माप सदैव देत आले आहे.इंडियातील लोक प्रथम दर्जाचे नागरिक तर भारतातील लोकांना नेहमीच दुय्यम दर्जाचे नागरिक समजुन सरकारने वागविले आहे.ही दुय्यमता
अगदी पाण्यासारख्या, ज्याची सर्वाना सारखी आवश्यकता असते ,बाबीवरून दिसून येते .अधिकृतपणे
असे मानण्यात आले आहे की शहरी नागरिकाला जेवढे पानी आवश्यक आहे त्याच्या पेक्षा एक तृतीयांश 
पाणी खेड्यात राहनारया साठी   पुरे आहे!यातही इंडियाची   गरज भागविन्यास प्राधान्य आणि गरज पडली तर शेतीचे पाणी इंडिया कड़े वळविनार - शेतकरयाची पर्वा न करता.इंडियाच्या डोळ्यातील
पाणी पुसन्यास सरकार तत्पर,भारतातील माणूस रडून भेकुन मेला तरी त्याची पर्वा नाही. गोऱ्यान्च्या क्षुल्लक-क्षुल्लक  बाबी  सर्व  समाजासाठी व् देशासाठी  सर्वाधिक महत्वाच्या व् अग्रक्रमाच्या बनून जातात.इंडियात राहणाऱ्या भारतातील गोऱ्या  लोकांची कांदा ही किती मोठी व्  अक्राळ  विक्राळ समस्या बनली होती हे आपण काही  महिन्यापूर्वी अनुभवले आहे.सर्व  सरकारी यंत्रणा,सर्व  प्रसिद्धी माध्यमे यानी युद्धस्तरावर प्रयत्न करुन  मोहिम उघडून चटकन त्यांच्या समस्या  दूर केल्या.पण  त्या दूर  करण्याच्या प्रयत्नात भारतातील
काळ्यान्च्या  डोळ्यात जे पाणी आले ते मात्र ना सरकारला दिसले ना  माध्यमाना! काळ्यानी समस्यांच्या विळख्यातच  जगावे हां अलिखित नियमच बनला आहे.
इंडियातील लोकानी मागणी करायचा अवकाश की ती पूर्ण करण्यासाठी सरकारची धावाधाव ,पण भारताच्या मागण्या आणि गरजा बाबत ठार बहिरे आणि
आन्धलेपण !या साठी भारताने कितीही मोठे आन्दोलन केले तरी सरकारवर असर होत नाही ,मुठभर 
इंडियन आंदोलक मात्र सरकारला झुकवु शकतात! नुकतेच झालेले अन्ना हजारे यांचे आन्दोलन सरकारला झुकवु शकले कारण ते आन्दोलन गोऱ्यान्चे होते !हां काही आरोप नाही .अधिकृतपणे आणि अगदी आन्दोलनकर्त्याच्या दाव्यानुसार ते आन्दोलन सिविल सोसायटीचे होते!खेडवळ लोकांचा
त्याच्याशी सम्बद्ध नव्हता.सिविल सोसायटी-नागरी समाज-याचा अर्थ सर्व समाज असा होतच नाही,सर्व साधारण समाजापेक्षा उन्नत समाज -अभिजनांचा समाज-म्हणजे सिविल सोसायटी !भारतीय  
जनतेचे आन्दोलन,भारतीय जनतेची मागणी असे शब्द प्रयोग अन्ना यांच्यासह कोणत्याही आंदोलक नेत्यानी केले नाही हे लक्षात घेन्या सारखे आहे. अन्नान्च्या भोवताली कोण होते हे पाहिले तरी आन्दोलन सामान्यांचे नव्हे तर अभिजनाचे होते हे पटेल.आंदोलनाच्या तात्पुरत्या पण झटपट यशाचे  
हे महत्वाचे कारण आहे.प्रसार माध्यमानी कांद्याचे भाव वाढले तेव्हा आलिशान गाड्यातुन  भाजी बाजारात
येणारया महिलांचा कान्गाव्याला मानाचे व् महत्वाचे स्थान दिले ,तसेच या आंदोलनाला डोक्यावर
घेतले हे साम्य लक्षात घेन्या सारखे आहे.अन्नान्च्या आंदोलनाच्या २-३ दिवस आधी भारताचे एक आन्दोलन संपले होते ,नव्हे ते सम्पविन्यात आले होते.जंतर-मंतर पासून काही मैलावर जाट समाजाचे आरक्षनाच्या मागणी साठी मोठे आन्दोलन सुरु होते.हजारोच्या (अन्नान्च्या गर्दी पेक्षा शेकडो  
पट अधिक संख्या) संख्येने महिला आणि पुरुष पंधरा दिवस उन्हा-तान्हाची पर्वा न करता उघड्यावर
बसून होते.पण माध्यमांची मेहेर नजर कधी या आन्दोलनाकडे वळली नाही.सर्वोच्च न्यायालयाची मात्र वक्र दृष्टी वळली व् आन्दोलकाना काहीच पदरी न पडता उठावे लागले. अन्नान्च्या आंदोलनाच्या  
बाबतीत मात्र माध्यमानी प्रचारकाची भूमिका बजावली.शेतकरी आंदोलनाच्या कालात महाराष्ट्रातील  
एका प्रतिष्ठित नागरी दैनिकाने संघटनेच्या आंदोलनाची चेकसह पाठविलेली जाहिरात छापन्यास नकार
दिला होता हे येथे नमूद केले पाहिजे.
अन्नांचे आन्दोलन चुक की बरोबर ,महत्वाचे की बिन महत्वाचे याचा आपण येथे विचार करीत नाही आहोत.अन्नांचे आन्दोलन काळ्याचे की गोऱ्याचे -इंडियाचे की भारताचे -एवढाच आपण विचार करीत आहोत.अन्नांचे आन्दोलन इंडियाचे आहे हे आंदोलनाचे चित्र आणि चरित्र पाहता म्हणता येइल.
अभिजन समाजाच एक व्यवच्छेदक लक्षण आहे ,त्याना त्यांच्या पेक्षा खालचे किंवा त्यांच्या शब्दात सांगायचे तर अडानचोट लोकांबद्दल कमालीचा तिटकारा असतो.या अडानचोट लोकानी निवडून दिलेले
प्रतिनिधी आपल्यावर राज्य करतात हे त्याना -सिविल सोसायटीवाल्याना-सतत सलत असते.मुर्ख
लोकांचे मुर्ख प्रतिनिधी ही त्यांची कायम भावना असते.अनेक वर्षे मनात दाबुन ठेवलेल्या या भावनाना अन्नान्च्या आन्दोलनाने बाहेर आल्या .कारण अन्दोलनाच्या नेत्यांची अशीच भावना होती हे त्यानी तयार केलेल्या  जन लोकपाल बिलाच्या मसुद्यावरुन स्पष्ट झालीच होती.भ्रष्टाचार खरे तर एक निमित्त होते.किंवा अगदी योग्य शब्दात सांगायचे तर उंटाच्या पाठीवर पडलेली ती शेवटची काडी होती.
खर तर सिविल सोसायटीला भ्रस्टाचाराचे वावडे नाही.अनुपम खेर सह जंतर मंतर  वर जमलेल्या नट -नट्यान्च्या बाबतीत काय म्हणाल?काला पैसा आणि कर बुडवेगिरित बोलिवुड चा कोणी हात धरु शकेल काय?  पण त्यानाही राज्यकर्त्याच्या भ्रस्टाचाराचा किती राग!
देशात भ्रष्टाचार विरोधी वातावरण तापलेले (?)असताना सत्य साईं बाबाकडे ४०००० कोटीची
सम्पत्ती असल्याचे उघड झाल्यावर किती गहजब व्हायला हवा होता.कोणत्याही उत्पादक
कामात नसताना वैध मार्गाने इतकी मोठी सम्पत्ती कशी जमू शकते हां प्रश्न कोणालाच
कसा पडला नाही?.जसे अनेकानी काला पैसा स्विस  बँकेत दडविला तसा या चालीस हजार कोटीत
नसेल हे सांगता येइल का?अगदी असे मानले की चेक द्वारा सर्व पैसा आला तरी तो पैसा
साइन्च्या उदो-उदो करण्यात आलेल्या जन कल्यानाच्या कार्या साठी होता.जमा करून ठेवन्या साठी
नव्हता.करातून सुट जन कल्याणार्थ खर्च करण्या साठी होती.तसा तो खर्च ही केला नाही व त्यावरील
कर ही भरला नाही ,राज्यकर्त्यानी जनतेची जशी फसवणुक करून पैसा जमा केला तशीच ही बाबानी
लोकांची व कायद्याची फसवणुक करून जमाविलेली माया आहे.पण अभिजनाना -सिविल सोसायटीला
या मायेचे केवढे कौतुक!
खर तर अन्नान्च्या आन्दोलन कालात 
जंतर मंतर वर येशु ख्रीस्त अवतरला असता आणि  भ्रष्टाचार कधीच केला नाही त्याने राज्यकर्त्या वर पहिला दगड मारावा असे सांगितले असते तर पूर्ण जंतर मंतर रिकामे झाले असते.तिथे उरले असते   फ़क्त आंदोलनाचा भावनिक प्रभाव वाढावा म्हणून नियोजनपूर्वक जमविलेले अबोध बालक!अन्नान्चा  सुद्धा अबोध बालकात समावेश होइल!!तात्पर्य ,आंदोलनाचे लक्ष्य भ्रष्टाचार निर्मूलन नव्हते तर 
 राज्यकर्ते हेच त्यांच्या निशानावर होते.अडाणी लोकांच्या नालायक प्रतिनिधीनी त्याना भ्रस्टाचाराचे
निमित्त स्वत:हुन दिले होते.राज्यकर्त्या ऐवजी भ्रष्टाचार त्यांच्या निशान्यावर असता तर जी व्यवस्था एवढ्या मोठ्या भ्रस्टाचाराला जन्म देते त्या व्यवस्थेत बदलाची मागणी त्यानी केली असती.पण त्याना लोकपाल बनून राज्यकर्त्याना तुरुंगात पाठविन्याचे महान कार्याने झपाटून टाकले आहे.म्हणून तर लोकपाल हाच पोलिस ,लोकपाल हाच न्यायाधीश आणि लोकपाल हाच तुरुन्गाधिकारी असला पाहिजे 
हां त्यांचा आग्रह आहे.इण्डियातील अभिजनाशिवाय राज्यकर्ते व् राजकीय संस्था यांच्या विषयी एवढी कमालीची घृणा दुसऱ्या कोणाला असू शकेल!सर्व सामान्य भारतीयांची हीच भावना असती तर आन्दोलना नंतर ज्या पाच राज्यात निवडनुका झाल्यात तेथे मतदारानी ९०%इतके विक्रमी मतदान केले नसते! यावरून  अन्नांचे आन्दोलन हे गोऱ्यान्चे -अभिजनाचे - इंडियाचे आन्दोलन आहे हेच सिद्ध होते.अन्नान्च्या आंदोलनाच्या झटपट यशाचे हेच खरे कारण आहे.

                                                (समाप्त)
सुधाकर जाधव
मोबाइल:९४२२१६८१५८
पांढरकवडा , जि.यवतमाळ

2 comments:

  1. pratyek gosticha Rural X Urban asach sanbandha jodne thik nahi. Surwatichya kalat jowar Sharad Joshi Kolant udya marat navte towar tyanche andolan hi successful hote. Mala watte Jantar-mantar andolanache timing achuk hote. Ani ajun andolan purna yashasvi zale ase mhanta yenar nahi.

    ReplyDelete
  2. Midiya ji goshta uchalun dharte ti yashaswi hote. e.g. cricket, Annanche Aandolan.-Kishore

    ReplyDelete